राजकारण

निवडक सावरकर घेणं चुकीचं : छगन भुजबळ

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. याचा भाजप, शिंदे गट आणि मनसेकडून निषेध करण्यात येत असून आंदोलने करत आहेत. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भुजबळ म्हणाले की, 75 व्या अमृत महोत्सव साजरा होत असतांना नेहरू-गांधी घराण्याचा उल्लेख केला नाही. त्यांचं त्यांना करू द्या पब्लिक सब जानती है. पण, जे आज सावरकरांसाठी रस्त्यावर उतरले त्यांचं काय योगदान आहे. त्यांच्या मातृसंस्थेचं देखील काही योगदान नाही. निवडक सावरकर घेणं चुकीच आहे, अशी टीका त्यांनी भाजपवर केली आहे.

तसेच, राहुल गांधींनी एवढे मोठे प्रश्न असताना असा विषय घेणे चुकीच आहे. पण, त्यांना सांगणारा मी कोण, असे भुजबळांनी म्हंटले आहे.

तर, शिवसेना नेते संजय राऊत यांनी महाविकास आघाडीमध्ये फुट पडण्याची शक्यता वर्तवली होती. यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले होते. यावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले, महाविकास आघाडी झाली त्यावेळेस प्रत्येकाने आपली आयडॉलॉजी जवळ ठेवली होती. शिवसेनेने कधी आमच्या सारख्या सर्वधर्म समभाव मान्य केला नाही. तसेच काँग्रेसने सुद्धा हिंदुत्व मान्य केलं नाही. भाजपला दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडी बनली होती. महाविकास आघाडी यांच्यात एक समान धागा आहे. भाजपला दूर ठेवणे हाच अजेंडा होता.

"परळी तालुक्यात अधिकाऱ्यांना धमकावून बोगस मतदान "; ट्वीटरवर व्हिडीओ शेअर करत आमदार रोहित पवारांनी केले गंभीर आरोप

IPL 2024 : अभिषेक-क्लासेनचा झंझावात! वादळी खेळी करून पंजाब किंग्जचा उडवला धुव्वा, हैदराबादचा दमदार विजय

"पाकिस्तानचा झेंडा घेऊन मिरवणाऱ्या उबाठाच्या उमेदवारांवर कारवाई करा"; किरण पावसकरांचा ठाकरेंवर हल्लाबोल

IPL 2024 : आरसीबीने CSK विरोधात रचला इतिहास; टी-२० क्रिकेटमध्ये 'हा' कारनामा करणारा ठरला पहिला संघ

"लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यांमध्ये महाविकास आघाडीनेच बाजी मारलीय"; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा मोठा दावा