राजकारण

पीएम मोदी मराठ्यांना ओबीसी करु शकले असते, पण...; जरांगेंचे टीकास्त्र

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर होते. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूसह विविध सेवांचे उद्घाटन केले. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडले आहे. मोदींना सामान्यांशी घेणं-देणं नाही. ते मराठ्यांना ओबीसी करु शकले असते, असे जरांगे पाटीलांनी म्हंटले आहे. ते सिंदखेडराजा येथे बोलत होते.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, पंतप्रधान मोदी सामान्यांशी काही घेणेदेणे नाही. ते मराठा ओबीसी करू शकले असते. पण त्यांनी ते केले नाही. परंतु, सामान्य काय करू शकेल हे त्यांना चांगल माहित आहे, असा इशारा त्यांनी दिला आहे. एकदा मोदींना आवाहन केलं होतं. पुन्हा-पुन्हा आवाहन करण्यासाठी आम्ही काय लेचेपेचे नाहीत, असेही जरांगेंनी म्हंटले आहे.

तसेच, राजकारण्यांना त्यांच्या राजकारणापुरता जिजामाता आणि छत्रपती आठवतात म्हणून आता आमचा मराठा समाज या विरोधात एकवटला आहे, असा अप्रत्यक्ष आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर नाव न घेता जरांगेंनी केला आहे. मी आणि माझा समाज शांततेने आंदोलन करणार आहे. जाणार म्हणजे जाणार 20 जानेवारीला आणि आरक्षण आणणार, असा निर्धार त्यांनी पुन्हा एकदा बोलून दाखवले आहे.

Jayant Patil : भुजबळ साहेब नाराज हे आम्ही ऐकून आहे

Summers: उन्हातून घरी आल्यावर चुकूनही करू नका 'या' गोष्टी...

India Alliance Meeting : बीकेसीत इंडिया आघाडीचं शक्तिप्रदर्शन, मविआ उमेदवारांच्या प्रचारासाठी होणार सभा

Anil Deshmukh : तटकरे साहेब हॉटेलमध्ये आमच्या कार्यकर्त्यांना भेटले; आमच्या संपर्कात जरी ते आले तरी आम्ही त्यांना घेणार नाही

Kejriwal Meet Thackeray : इंडिया आघाडीच्या सभेआधी केजरीवाल घेणार ठाकरेंची भेट