Kishori Pendekar
Kishori Pendekar Team Lokshahi
राजकारण

आम्ही पहिल्यापासूनच जमिनीवर, आम्हाला काय जमीन दाखवणार पेडणेकरांचे शाहांना प्रत्युत्तर

Published by : Sagar Pradhan

आगामी मुंबई महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री भाजप नेते अमित शाह हे आज मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर असताना त्यांनी 'मिशन मुंबई' वर लक्ष केंद्रित केले आहे. शाह यांच्या उपस्थिती आज भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. त्यावर आता मुंबई माजी महापौर, शिवसेना उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

मुंबईकरांना तुमचे धोके आणि खोके देखील नको

किशोरी पेडणेकर यांनी उत्तर देतांना म्हणाल्या की, मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेने प्रथम 150 चा नारा दिला आहे. अमित शाह हे केंद्रीय नेते आहेत, त्यांनी 150 चा नारा देणं म्हणजे आमची कॉपी आहे. शिवाय धोके कोण कोणाला देत आहे हे दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्वजण पाहात आहेत. मुंबईकरांना तुमचे धोके आणि खोके देखील नको आहेत. आम्ही पहिल्यापासूनच जमिनीवर आहोत, आम्हाला काय जमीन दाखवणार, तुम्ही आस्मानात आहात ते आम्ही तुम्हाल जमिनीवर आणू, लवकरच भाजपला त्यांची जागा दाखवू असा इशारा शिवसेना उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनी अमित शाह यांच्या टिकेला उत्तर दिले आहे.

काय केली होती अमित शाह यांनी टीका?

अमित शाह उद्धव ठाकरेंवर टीका करताना म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी आपल्याला धोका दिला. 2014 साली दोन जागांसाठी शिवसेनेने युती तोडली. राजकारणात जो धोका सहन करतो, तो कधीच मजबूत होऊ शकत नाही. उद्धव ठाकरे यांनी पाठीत सुरा खुपसला. जनमताचा अपमान केला हे मुद्दे सांगण्यासाठी आता संकोच नको. कानाखाली मारली तर ती शरीराला लागते. मात्र, आपल्या घरासमोर कानाखाली मारली. तर तिचा आवाज अंतर्मनापर्यंत जातो. आता उद्धव ठाकरे यांना जमिन दाखवण्याची वेळ आली आहे. शिंदे सरकार हीच खरी शिवसेना आहे, अशा शब्दांत त्यांनी उध्दव ठाकरेंवर शरसंधान साधले असून कार्यकर्त्यांमध्ये उर्जा भरली आहे.

IPL 2024 : धरमशाला मैदानात चेन्नई बनला सुपर 'किंग'! पंजाबचा केला दारुण पराभव

"तुतारीची आता पिपाणी करायची आहे"; फलटणच्या सभेत उपमुख्यमंत्री फडणवीसांचा शरद पवारांवर हल्लाबोल

अलिबागच्या सभेत उद्धव ठाकरेंचा PM मोदींवर निशाणा, म्हणाले; "एकनाथ खडसेंचा मला फोन आला आणि..."

"छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास घडवला पण आज परिस्थिती बदलली"; शरद पवारांचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा

"३७० कलम हटवलं पण दहशतवाद अजून संपला नाही", सांगलीच्या सभेत आदित्य ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल