राजकारण

Rajya Sabha Election : राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार

Published by : Siddhi Naringrekar

राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार आहे. राज्यसभेच्या सहा जागांसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या सहा उमेदवारांनी अर्ज भरल्याने निवडणूक बिनविरोध होणार आहे. महाराष्ट्रातून राज्यसभेच्या सहा जागांसाठीची निवडणूक बिनविरोध झाली आहे.

राज्यसभेच्या सहा जागांसाठी सातजणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या निवडणुकीसाठी दाखल झालेला अपक्ष उमेदवाराचा सातवा अर्ज छाननीत बाद झाला आहे. भाजपकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे यांनी अर्ज केले आहेत. शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांनी तर राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसकडून चंद्रकांत हांडोरे यांनी अर्ज दाखल केले.

त्यानंतर आता अपक्ष म्हणून विश्वास जगताप यांनी अर्ज भरला होता. यासाठी सूचक, अनुमोदक म्हणून आमदारांच्या सह्या लागतात मात्र जगताप यांच्याकडून त्याची पुर्तता करण्यात आली नाही, यामुळे त्यांचा अर्ज छाननीत बाद करण्यात आला. उमेदवारीला अर्ज मागे घेण्याची फेब्रुवारी ही शेवटची तारीख आहे. त्यावेळी याबाबतची अधिकृत घोषणा केली जाईल.

"उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये आधीच विलीन झालाय"; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा

टी-२० वर्ल्डकपआधी कर्णधार रोहित शर्माचं फॉर्मबाबत मोठं विधानं; म्हणाला,"फलंदाज म्हणून मला..."

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

"देशभक्त शब्दावर आक्षेप घेणारे फडणवीस देशद्रोही आहेत"; उद्धव ठाकरेंचा उपमुख्यमंत्र्यांवर पलटवार