राजकारण

केंद्राच्या दबावापोटी सुरू असलेला डाव उधळला जाईल : संजय राऊत

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : शिवसेनेच्या चिन्हाच्या वादावर 12 जानेवारीपासून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सुनावणी होणार आहे. याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. राजकीय दबावापोटी केंद्राच्या ते डाव उधळला जाईल आणि या देशांवर घटनांनी न्याय निर्माण केला आहे ते शाबूत आहे हे देशाला दिसून येईल, अशा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

संजय राऊत म्हणाले की, निवडणूक आयोगाच्या सर्व नेमणूका सरकार आपल्या मर्जीने करते. तरी आम्ही निवडणूक आयोगावर विश्वास ठेवतो. पक्षाबद्दल निर्णय घेतले जातील ही एक स्वायत्त संस्था आहे. आम्हाला आतापर्यंत स्वातंत्र्य आणि स्वायत्तता दिसला नाही तरी आम्ही देशाचा प्रमुख स्तंभ आहे त्याच्यावरती आम्ही विश्वास ठेवतो.

सर्वोच्च न्यायालयावरती आम्ही विश्वास ठेवतो. अजून या देशांमध्ये संविधान न्याय आणि कायदा जिवंत आहे असे आम्ही मानतो. काय घटनाबाह्य महाराष्ट्रामध्ये जे काही घडवलेला आहे. राजकीय दबावापोटी केंद्राच्या ते डाव उधळला जाईल आणि या देशांवर घटनांनी न्याय निर्माण केला आहे ते शाबूत आहे हे देशाला दिसून येईल. आणि आम्ही संपूर्णपणे तयारी यासाठी केलेले आहे. जे गेलेले आहे त्यांच्यामुळे काही फरक पडत नाही, असेही त्यांनी म्हंटले आहे.

पंतप्रधान मोदींचा इंडिया आघाडीला थेट इशारा, साताऱ्यात म्हणाले, "मी जिवंत आहे, तोपर्यंत..."

IPL मध्ये जॅक्सने दाखवली 'विल'पॉवर! ख्रिस गेलचा दहा वर्षांपूर्वीचा 'हा' विक्रम मोडला

Rahul Shewale: 'कॉंग्रेसच्या विचारांचा पराभव करायचायं' अर्ज दाखल करण्यापूर्वी शेवाळेंची प्रतिक्रिया

Harbour Local: हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत; CSMT जवळ लोकलचा डबा घसरला

सोलापूरमध्ये PM नरेंद्र मोदींचं 'इंडिया'आघडीवर शरसंधान, म्हणाले; "देशाला भ्रष्टाचार, दहशतवादात..."