राजकारण

'त्या' विधानावरुन सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांची पाठराखण

Published by : Shweta Shigvan-Kavankar

पुणे : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या विधानाचे पडसाद राज्यभरात उमटले आहेत. अजित पवारांविरोधात भाजपने ठिकठिकाणी आंदोलने केली असून राजीनाम्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांची पाठराखण केली आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ईडी सरकारने मीडियाशी बोलण्याऐवजी आंदोलनकर्त्यांशी बोलायला हवं. एखाद्या दिवशी प्रसिद्धी मिळाली नाही तर काय बिघडले का? रोज टीव्ही वर कशाला यायला हवं. मुख्य मागणीला बगल द्यायचं. हेच तर सुरुये, अशी टीका त्यांनी केली आहे. तसेच, आपल्या संविधानात प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. तो अधिकार असल्यानं त्यात गैर काय, असे म्हणत त्यांनी अजित पवारांची पाठराखण केली आहे.

उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्या वादाबाबत विचारले असता सुप्रिया सुळे म्हणाल्या, अशा वेळी कैलासवासी अरुण जेटली मला आठवतात. तुम्ही दाखवणं बंद करा, लोकं बोलणं बंद करतील. राष्ट्रवादी काँग्रेससह सर्व पक्षांना विनम्र आवाहन आहे, आपल्या गलिच्छ राजकारणासाठी, कोणत्या ही विषयासाठी महिलेविषयी कोणी ही बोलू नये. हात जोडून मी विनंती करते, महाराष्ट्राची परंपरा आहे. सामाजिक परिवर्तनाची सुरुवात महाराष्ट्रातून होते. त्यामुळं या सर्वांचा विचार करून. स्वतःला आवरलं पाहिजे. त्यामुळं मला अशा विषयी मला प्रतिक्रिया विचारली की आधीपासूनच हीच विनंती करत आलेले आहे. मुळात मला जनतेनं निवडून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी दिलेलं आहे. महाराष्ट्रात महागाई, बेरोजगारी आणि विजेचा तुटवडा हे प्रामुख्याने आव्हान आहेत. याकडे सर्वांनी लक्ष द्यायला हवं, असे त्यांनी म्हंटले आहे.

Daily Horoscope 07 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांचं नशीब सोन्यासारखं चमकणार; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 07 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

ICSE 2024 Results: आयसीएसई बोर्डाचा १०वी, १२वीचा निकाल जाहीर; यंदा मुलींनी मारली बाजी!

Rohit Pawar: रोहित पवारांचा विरोधकांवर हल्लाबोल; सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाले...

Rice Water: चमकदार त्वचेसाठी तांदळाच्या पाण्याचे फायदे जाणून घ्या...