Bachhu kadu
Bachhu kadu  Team Lokshahi
राजकारण

आळस काढलेल्या राजाचं राज्य टिकत नाही, बच्च कडूंचा ठाकरेंना टोला

Published by : Sagar Pradhan

राज्यात एकीकडे राजकीय गोंधळ सुरु असताना अशातच सत्ताधारी आणि विरोधाकांमध्ये जुंपलेली असताना त्यातच आता प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. आळस काढलेल्या राजाचं राज्य टिकत नाही असा टोला त्यांनी लगावला आहे.

नेमकं काय म्हणाले कडू?

मी राजा झालो म्हणून झोपायचं ठरलेले वेळात भेटायचं असं होता कामा नये. एक तर राजा व्हायचंच नाही झालं तर मग आळस काढत असेल तर त्या राज्याचं राज्य टिकत नाही हे उद्धव ठाकरे यांनी दाखवून दिलं आहे असा टोला बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. अमरावतीत एका कार्यालयात बच्चू कडू बोलत होते, तर जेव्हा मंत्रीपदाची रेस सुरू होती तेव्हा प्रत्येक जण चांगलं खातं मागत होते,सगळ्या गोष्टींनी वजनदार खातं मागण्याची रेस सुरू होती पण मी राज्यातील पहिला माणूस होतो की मी दिव्यांग मंत्रालय मागितलं अशीही प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली.

Abhijeet Patil: अभिजीत पाटील यांना दिलासा, विठ्ठल कारखान्यावरील जप्तीची कारवाई मागे

2017मध्ये राष्ट्रवादीचं काय ठरलं होतं? सुनिल तटकरे यांनी लोकशाहीला थेट सांगितलं

निवडणुकीदरम्यान 'डीप फेक' रोखण्यासाठी कारवाई करण्याचे शासनाचे आदेश

Rajendra Gavit : पालघर लोकसभेची उमेदवारी मला नाकारली गेली,त्यामुळे माझ्या दृष्टीने एक दु:खद घटना असं म्हणायला हरकत नाही

अमिताभ बच्चन यांच्या ट्विटवरून शिवसेना UBT-भाजप ट्विटर वॉर