आज इंडिया आघाडीची बैठक होत आहे. त्यासाठी उद्धव ठाकरे हे दिल्लीला आहेत. आज त्यांनी दिल्लीतून पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. आमच्या देशाचं हित हा आमचा स्वार्थ आहे. त्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. आज इंडिया आघाडीची बैठक होत आहे. अनेक मुद्यांवर आज चर्चा होईल.
तसेच निवडणुकीत काय करायचं यावर बैठकीत चर्चा होईल. आज नाही तर उद्या जागा वाटप करावंच लागेल.देशाची लोकशाही हाच आमचा स्वार्थ आहे. त्यासाठी मी अनेकांना भेटतो मी काही हुडी वगैरे घालून भेटणार नाही. थंडी वाजते म्हणून मी स्वेटर घातला आहे.
शिवराज सिंह यांच्याप्रमाणे उद्या नरेंद्र मोदी यांनाही बदललं जाऊ शकतं, असं मोठं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.