राजकारण

'लोकशाही'ने सौमय्यांचे खरं रुप समोर आणलं; विद्या चव्हाणांचा घणाघात

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : किरीट सोमैया यांच्या व्हिडिओ प्रकरणी मुंबई पोलिसांनी 'लोकशाही' चॅनलच्या संपादकांविरोधातच गुन्हा दाखल केला आहे. याचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. तर, राजकीय वर्तुळातूनही यावर प्रतिक्रिया उमटत आहे. अशातच, विद्या चव्हाण यांनी किरीट सोमय्या आणि देवेंद्र फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

लोकशाहीने लोकशाही मार्गाने किरीट सोमय्यांचे खरे रुप लोकांसमोर आणले. हा संवैधानिकरित्या माध्यमांना अधिकार आहे आणि तो अधिकार हिरवून घेणारे फडणवीस कोण आहेत? असा सवालच विद्या चव्हाण यांनी विचारला आहे. फडणवीसांकडे गृहखाते आहे परंतु, त्यांनी सोमय्यांची काय चौकशी केली? उलट कमलेश सुतार यांच्यावर गुन्हा दाखल केला.

मी सुतार यांचे अभिनंदन करते की त्यांनी सोमय्यांचे खरे रुप समोर आणलेले आहे. आता फडणवीसांचेही खरे रुप दिसत आहे. ते नेहमी विधी आणि न्याय खात्याचा गैरवापर करतात. ते गृहखात्याचा गैरपवापर करत आहेत आणि गुन्हेगारांना पाठिशी घालण्याचे काम फडणवीसांनी केलेलं आहे. पंतप्रधान मोदी किंवा शिंदे-फडणवीसांनी एकतर हुकुमशाही घोषित करावी आणि नंतर जे वाटेल ते करावे. परंतु, अशाप्रकारे माध्यमांचा गळा घोटण्याचे काम सहन केले जाणार नाही. सुतार यांच्या पाठिशी सर्व जनता उभी राहिल्याशिवाय रहणार नाही, असे त्यांनी म्हंटले आहे.

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...

"उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये आधीच विलीन झालाय"; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा

टी-२० वर्ल्डकपआधी कर्णधार रोहित शर्माचं फॉर्मबाबत मोठं विधानं; म्हणाला,"फलंदाज म्हणून मला..."

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...