विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा आहे. आज विरोधकांचा अंतिम आठवडा प्रस्ताव सादर होणार आहे. या अधिवेशनात विरोधकांनी शेती प्रश्नासह विविध मुद्यांवरुन सरकारला धारेवर धरलं. पावसामुळं शेतकऱ्यांच्या नुकसान झालं आहे.
आजही विरोधक विधानभवनाच्या पायऱ्यावर आंदोलन करण्याची शक्यता आहे. राहुल गांधींच्या विरोधात सत्ताधाऱ्यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली. राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी सत्ताधाऱ्यांनी केली.
आज विरोधी पक्षांचा अंतिम आठवडा प्रस्ताव सादर होणार आहे. या अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेवरती चर्चा केली जाणार आहे.