Uddhav Thackeray  Team Lokshahi
ताज्या बातम्या

काश्मिरी हिंदुंसाठी जे जे शक्य होईल ते करणार - उद्धव ठाकरे

खोऱ्यात हिंदुंना टार्गेट करुन मारण्याच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढ झाली आहे.

Published by : Sudhir Kakde

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कश्मीर खोऱ्यात कश्मिरी पंडित आणि हिंदूंचं टार्गेट किलिंग' सुरू आहे. महिनाभरात अनेक कश्मिरी पंडितांची हत्या करण्यात आली. शेकडो भयभीत कश्मिरी पंडितांचं पलायन सुरू झालं आहे. अवघ्या देशात याबद्दल तीव्र संताप व्यक्त होतोय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खोऱ्यातील या परिस्थितीबाबत तीव्र चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, कश्मीर खोऱ्यात कश्मिरी पंडितांचं अक्षरश: शिरकाण सुरू आहे. त्यांना घरवापसीचं स्वप्नं दाखवलं गेलं, मात्र घरवापसी तर दूरच उलट तिथल्या पंडितांना वेचून वेचून मारलं जातंय. या भयानक परिस्थितीत पंडितांचं मोठ्या प्रमाणावर पलायन सुरू झालं, ही धक्कादायक तितकीच अस्वस्थ करणारी घटना आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या विषयावर बोलताना सांगितलं की, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मी एवढंच वचन देऊ शकतो की, या कठीण काळात कश्मिरी पंडितांच्या मागे महाराष्ट्र ठामपणे उभा राहील. काश्मिरमध्ये कलम 370 हटवल्यानंतर परिस्थिती बदलेल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र काश्मिरी पंडितांवर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये पुन्हा वाढ झाली आहे. त्यामुळे आता विरोधी पक्षांनी भाजला घेरण्यास सुरुवात केली आहे. काश्मिरमधल्या हल्ल्यांवर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजवर टीका केली आहे. कलम 370 हटवल्यानंतरही जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) तीच स्थिती कायम आहे. काश्मिरी पंडितांच्या नशिबात पलायनच आहे. काश्मीर फाईल्स 2 हा चित्रपट काढावा आणि आताच्या परिस्थितीला कोण जबाबदार आहे हे त्यात दाखवण्यात यावे असे राऊत म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा

Gujrat Rain Update : गुजरातमध्ये समुद्र खवळला; तीन बोटी बुडाल्या

Chhatrapati Sambhajinagar : "काळजी घ्या" मृत्यूपूर्वी वडिलांना फोन! सिलेंडरमध्ये खुपसवली कात्री अन् स्फोटादरम्यान CA विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

Monorail : मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार; MMRDAने घेतला महत्त्वाचा निर्णय