ताज्या बातम्या

मनोज जरांगे पाटील यांचा राज्य सरकारला नवा अल्टीमेटम; 5 जानेवारीपर्यंत सरकारने मराठा आरक्षणाचा विषय मार्गी काढावा

महायुतीचा शपथविधी सोहळा काल पार पडला.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

  • मनोज जरांगे पाटील यांचा राज्य सरकारला नवा अल्टीमेटम

  • 5 जानेवारीपर्यंत आरक्षणावर तोडगा काढण्याची मागणी

  • महायुती सरकारला शुभेच्छा देत आरक्षणाची मागणी

महायुतीचा शपथविधी सोहळा काल पार पडला. मुंबईतील आझाद मैदानावर भव्य शपथविधी सोहळा पार पडला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

यातच आता मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला नवा अल्टीमेटम दिला आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले की, सरकार आता स्थापन झाले आहे. आता जनतेचे प्रश्न मार्गी काढणे गरजेचे आहे. समाजात खदखद आहे ही त्यांना दिसत नसेल पण ती भयंकर लाट आहे. ते परेशान होऊन जातील.

यासोबतच ते म्हणाले की, 5 तारखेला काल त्यांचे सरकार स्थापन झाले आहे. त्यांना आम्ही शुभेच्छा दिल्या आहेत. मनापासून तिघांचे अभिनंदन केलं आहे. पुढच्या काळात गोरगरिबांचे प्रश्न मार्गी काढायचे. येत्या 5 जानेवारीपर्यंत 1 महिन्यात त्यांनी तिथपर्यंत त्यांनी मराठा आरक्षणाचा विषय मार्गी काढायचा. नसता हे मराठे पुन्हा तुफान ताकदीने आंदोलनात उभे राहून सरकारला परेशान करणार. 5 तारखेपर्यंत त्यांनी मराठा आरक्षणाचा विषय सगळा मार्गी काढायचा. असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Asia Cup 2025 : ब्रोंको टेस्ट पास करा तरचं संघात चान्स! BCCI चा नवा नियम; ब्रोंको टेस्ट म्हणजे काय? Bronco Test

Rohit Pawar : शिखर बँक घोटाळाप्रकरणी आमदार रोहित पवारांची जातमुचलक्यावर सुटका

Raigad Boat Accident : रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, बचावकार्य युद्धपातळीवर

Latest Marathi News Update live : रायगडच्या उरणजवळ समुद्रात बोट बुडाली