ताज्या बातम्या

Maratha Aarakshan : मराठा आरक्षणाचा लढा तीव्र होणार, 29 ऑगस्टला मुंबईत आंदोलन; जरांगे-पाटलांचा सरकारला इशारा

मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी मुंबईत आंदोलनाचा एल्गार केला आहे. आज, बुधवारी माध्यमांशी संवाद साधताना यांनी आंदोलनाची घोषणा केली.

Published by : Rashmi Mane

मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी मुंबईत आंदोलनाचा एल्गार केला आहे. आज, बुधवारी माध्यमांशी संवाद साधताना यांनी आंदोलनाची घोषणा केली. त्यांनी सरकारकडे पाच ते सहा मागण्या केल्या असून त्या मागण्या मान्य झाल्या नाही, तर 29 तारखेपासून मुंबईत आंदोलन करणार असल्याचे आज जाहीर केले. एकतर विजयाचा रथ येईल किंवा अंत्ययात्रेचा; असा निर्धार जरांगेंनी यावेळी व्यक्त केला आहे.

यावेळी जरांगे पाटील म्हणाले की, सरकारने शब्द दिला होता. पण आता ते विसरत आहेत. मराठ्यांनीच ही सत्ता मिळवून दिलेली आहे. जातीसाठी मी मरायला भीत नाही. मुंबईत त्यासाठीच येतोय, माझ्यावर हल्ला करायचा प्लॅन असेल तर मीच मुंबईत येतोय. जे आंदोलन आंतरवलीत होणार आहे, तेच मुंबईतही होणार आहे. 29ऑगस्टला हे आंदोलन होईल. 28 ला मला सोडायला मुलं येतील, त्यानंतर 29 तारखेला ते माघारी शेतीतली कामं करतील. माझ्या मुलांना जराही धक्का लागला तर कुणाचीच खैर करणार नाही. मुंबईमध्ये मी शांततेत आंदोलन करणार आहे. 28 ऑगस्टच्या आत सगळ्या अंमलबजावण्या झाल्या पाहिजेत, असे त्यांनी नमूद केले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Asia Cup 2025 : ब्रोंको टेस्ट पास करा तरचं संघात चान्स! BCCI चा नवा नियम; ब्रोंको टेस्ट म्हणजे काय? Bronco Test

Rohit Pawar : शिखर बँक घोटाळाप्रकरणी आमदार रोहित पवारांची जातमुचलक्यावर सुटका

Raigad Boat Accident : रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, बचावकार्य युद्धपातळीवर

Latest Marathi News Update live : रायगडच्या उरणजवळ समुद्रात बोट बुडाली