ताज्या बातम्या

Manoj Jarange Patil: आताची मोठी बातमी! मनोज जरांगेंनी साखळी उपोषण 15 दिवस पुढे ढकललं, कारण काय?

मनोज जरांगेंनी साखळी उपोषण 15 दिवस पुढे ढकललं, जाणून घ्या यामागील कारण आणि त्यांचे पुढील पाऊल.

Published by : Prachi Nate

मराठा आरक्षक मनोज जरांगे पाटील यांनी आज अंतरवाली सराटीत पत्रकार परिषद घेतली, ज्यात त्यांनी 15 फेब्रुवारीपासून राज्यव्यापी साखळी उपोषणाची घोषणा केली. याचसोबत त्यांनी सरकारकडे उर्वरीत 2 मागण्या 15 दिवसांत पूर्ण करा अशी मागणी देखईल केली. या 15 दिवसांत म्हणजे फेब्रुवारी महिन्याच्या अखेर पर्यंत सरकारने उर्वरीत 2 मागण्या पूर्ण कराव्यात, अन्यथा पुन्हा आंदोलन सुरू करणार असल्याचा इशारा जरांगे पाटलांनी दिला आहे.

...अन्यथा पुन्हा आंदोलन सुरू करणार, जरांगेंचा सरकारला इशारा

मनोज जरांगे म्हणाले की, पंधरा तारखेला साखळी उपोषण करण्याच जाहीर केलेल आहे. त्याच कारण असं होत की, सरकारच्या म्हणण्यानुसार आपण ते उपोषण थांबवलं. पंधरा तारखेला साखळी उपोषण राज्यव्यापी करायचं ठरवलं होतं ते दहा-पंधरा दिवस पुढे ढकलतो आहे. सरकार काम करत असेल तर कशाला उपोषण करायचं सरकार काम करत असेल तर सहकार्य केलं पाहिजे या भूमिकेत राहिला पाहिजे.

पण, उपोषण सोडताना दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी होत नव्हती. काल दोन मागण्यांचा शासन निर्णय सरकारने घेतला आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांच कौतुक करतो चार पैकी दोन मागण्यांसाठी त्यांनी तयारी दाखवली. शिंदे समितीला मुदतवाढ दिली, गॅझेट लागू करून म्हणून उल्लेख केला आहे. सगे सोयरेच्या अंमलबजावणीसाठी तीन महिन्याचा वेळ लागणार असल्याच त्यांनी सांगितलं. नुसत शिंदे समितीला मुदतवाढ देऊन उपयोग नाही, तिला मनुष्यबळ द्या आणि कक्ष स्थापन करून द्या. राहिलेले दोन मागणीची आठ पंधरा दिवसात अंमलबजावणी करा.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर

Latest Marathi News Update live : भारत विरूद्ध इंग्लंड कसोटी सामन्यात कर्णधार शुभमन गीलचं पहिलं द्विशतक

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना धनलाभ होण्याची शक्यता, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य