जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे होणाऱ्या आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हावरून सध्या जोरदार वाद पेटल्याचं पाहायला मिळतय. बोधचिन्हात मंदिराचे चित्र का, असे प्रश्न काही साहित्यप्रेमींनी उपस्थित केला आहे. या बोधचिन्हातून विशिष्ट विचारांच्या प्रचाराचा प्रयत्न झाल्याचा आक्षेपही नोंदवला आहे.