Asaduddin Owaisi Team Lokshahi
ताज्या बातम्या

Delhi Riots : धार्मिक मिरवणुकीत शस्त्रांची गरज काय? दंगलीनंतर ओवैसींचा सवाल

परवानगी शिवाय मिरवणूक का काढू दिली? ओवैसींचा दिल्ली पोलिसांना सवाल

Published by : Sudhir Kakde

दिल्ली : दिल्लीतील जहांगीरपुरी भागात झालेल्या हिंसाचारानंतर (Jahangirpuri Riots) देशातील वातावरण ढवळून निघालं आहे. हनुमान जयंतीच्या (Hanuman Jayanti) निमित्ताने काढण्यात आलेल्या शोभायात्रेवर काही लोकांनी दगडफेक (Delhi Riots) केल्यानंतर इथे मोठी दंगल उसळली. यावेळी दगडफेक, जाळपोळ आणि मोठा हिंसाचार झाला. या घटनेत अनेकजण जखमी झाले आहेत. त्यानंतर आता या प्रकरणात एमआयएम पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

असदुद्दीन ओवैसी यांनी या प्रकरणावर बोलताना दिल्ली पोलिसांना सवाल केले आहेत. ओवैसी म्हणाले, "दिल्ली पोलीस आयुक्तांनी सांगितलं की, जहांगीरपुरीमध्ये काढण्यात आलेल्या शोभायात्रेसाठी परवानगी घेतली नव्हती. या यात्रेत हत्यारं होती, गावठी पिस्तुलं होती धारदार शस्त्र होती. तसंच वादग्रस्त घोषणा दिल्या जात होत्या. हे सगळं होत असताना पोलीस डोळे लावून बसले होते असं ओवैसी म्हणाले.

असदुद्दीन ओवैसी म्हणाले, जर तुम्हाला धार्मिक शोभायात्रा काढायची असेल, तर तुम्ही हत्यारं का बाळगत होतात. त्या ठिकाणी असलेल्या एका मशिदीवर झेंडा लावण्याचा प्रयत्न का झाला असा सवाल ओवैसींनी केला. तसंच हे सर्व होत असताना पोलीस काय करत होते असंही त्यांनी विचारलं आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात

Jalgaon Accident : आयशर वाहनाची एसटी बसला जोरदार धडक; बसचे मोठे नुकसान, 1 जणाचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी