Asaduddin Owaisi
Asaduddin Owaisi Team Lokshahi
ताज्या बातम्या

Delhi Riots : धार्मिक मिरवणुकीत शस्त्रांची गरज काय? दंगलीनंतर ओवैसींचा सवाल

Published by : Sudhir Kakde

दिल्ली : दिल्लीतील जहांगीरपुरी भागात झालेल्या हिंसाचारानंतर (Jahangirpuri Riots) देशातील वातावरण ढवळून निघालं आहे. हनुमान जयंतीच्या (Hanuman Jayanti) निमित्ताने काढण्यात आलेल्या शोभायात्रेवर काही लोकांनी दगडफेक (Delhi Riots) केल्यानंतर इथे मोठी दंगल उसळली. यावेळी दगडफेक, जाळपोळ आणि मोठा हिंसाचार झाला. या घटनेत अनेकजण जखमी झाले आहेत. त्यानंतर आता या प्रकरणात एमआयएम पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

असदुद्दीन ओवैसी यांनी या प्रकरणावर बोलताना दिल्ली पोलिसांना सवाल केले आहेत. ओवैसी म्हणाले, "दिल्ली पोलीस आयुक्तांनी सांगितलं की, जहांगीरपुरीमध्ये काढण्यात आलेल्या शोभायात्रेसाठी परवानगी घेतली नव्हती. या यात्रेत हत्यारं होती, गावठी पिस्तुलं होती धारदार शस्त्र होती. तसंच वादग्रस्त घोषणा दिल्या जात होत्या. हे सगळं होत असताना पोलीस डोळे लावून बसले होते असं ओवैसी म्हणाले.

असदुद्दीन ओवैसी म्हणाले, जर तुम्हाला धार्मिक शोभायात्रा काढायची असेल, तर तुम्ही हत्यारं का बाळगत होतात. त्या ठिकाणी असलेल्या एका मशिदीवर झेंडा लावण्याचा प्रयत्न का झाला असा सवाल ओवैसींनी केला. तसंच हे सर्व होत असताना पोलीस काय करत होते असंही त्यांनी विचारलं आहे.

"उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये आधीच विलीन झालाय"; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा

टी-२० वर्ल्डकपआधी कर्णधार रोहित शर्माचं फॉर्मबाबत मोठं विधानं; म्हणाला,"फलंदाज म्हणून मला..."

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

"देशभक्त शब्दावर आक्षेप घेणारे फडणवीस देशद्रोही आहेत"; उद्धव ठाकरेंचा उपमुख्यमंत्र्यांवर पलटवार