Asaduddin Owaisi Team Lokshahi
ताज्या बातम्या

Delhi Riots : धार्मिक मिरवणुकीत शस्त्रांची गरज काय? दंगलीनंतर ओवैसींचा सवाल

परवानगी शिवाय मिरवणूक का काढू दिली? ओवैसींचा दिल्ली पोलिसांना सवाल

Published by : Sudhir Kakde

दिल्ली : दिल्लीतील जहांगीरपुरी भागात झालेल्या हिंसाचारानंतर (Jahangirpuri Riots) देशातील वातावरण ढवळून निघालं आहे. हनुमान जयंतीच्या (Hanuman Jayanti) निमित्ताने काढण्यात आलेल्या शोभायात्रेवर काही लोकांनी दगडफेक (Delhi Riots) केल्यानंतर इथे मोठी दंगल उसळली. यावेळी दगडफेक, जाळपोळ आणि मोठा हिंसाचार झाला. या घटनेत अनेकजण जखमी झाले आहेत. त्यानंतर आता या प्रकरणात एमआयएम पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

असदुद्दीन ओवैसी यांनी या प्रकरणावर बोलताना दिल्ली पोलिसांना सवाल केले आहेत. ओवैसी म्हणाले, "दिल्ली पोलीस आयुक्तांनी सांगितलं की, जहांगीरपुरीमध्ये काढण्यात आलेल्या शोभायात्रेसाठी परवानगी घेतली नव्हती. या यात्रेत हत्यारं होती, गावठी पिस्तुलं होती धारदार शस्त्र होती. तसंच वादग्रस्त घोषणा दिल्या जात होत्या. हे सगळं होत असताना पोलीस डोळे लावून बसले होते असं ओवैसी म्हणाले.

असदुद्दीन ओवैसी म्हणाले, जर तुम्हाला धार्मिक शोभायात्रा काढायची असेल, तर तुम्ही हत्यारं का बाळगत होतात. त्या ठिकाणी असलेल्या एका मशिदीवर झेंडा लावण्याचा प्रयत्न का झाला असा सवाल ओवैसींनी केला. तसंच हे सर्व होत असताना पोलीस काय करत होते असंही त्यांनी विचारलं आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा