Mahesh Tapase Team Lokshahi
ताज्या बातम्या

'मोहन भागवत यांनी केंद्र सरकारला खडे बोल सुनवन्याची आवश्यकता' राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी जाती व वर्णव्यवस्था नष्ट केली पाहिजे असं विधान केलं होतं.

Published by : shweta walge

मयुरेश जाधव, अंबरनाथ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी जाती व वर्णव्यवस्था नष्ट केली पाहिजे असं विधान केलं होतं. याबाबत बोलताना राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी जाती वर्ण व्यवस्था आणि दलितांना समान हक्क समान संधी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत दलितांवरचा अत्याचार बंद होणार नाही. कृतीमध्ये आणण्यासाठी मोहन भागवतांनी सरकारला देखील खडे बोल सोनवण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.

यावेळी बोलताना तपासे यांनी देशातील जाती व वर्णव्यवस्था नष्ट करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रयत्न केले. म्हणूनच काळाराम मंदिरात प्रवेश मिळाला, गणपतराव तपासे यांनी मंदिर प्रवेश कायदा आणून दलितांसाठी मंदिर उघडे केले, मात्र हजारो वर्षांपासून रोजगारापासून सामाजिक न्याय हक्कापासून वंचित ठेवण्यात आलं. या संदर्भात मोदी सरकारच्या कालखंडात अत्याचार वाढला आहे.

हा नॅशनल क्राइम रेकॉर्ड सांगत आहे. 11% ची ॲट्रॉसिटीची वाढ ही 2019 ते 2021 या कालखंडात झाली आहे. सात लाख केसेस या कालखंडात दर्ज झालेले आहेत अशा पद्धतीने दलितांवर अत्याचार होत आहेत त्याच्या संदर्भात आरएसएसने मोदी सरकारला सूचना देण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mumbai Mega Block : मुंबईकरांनो! आज लोकलचं वेळापत्रक बघूनच घराबाहेर पडा; तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

Wadala Vitthal Mandir : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विठुरायाच्या चरणी नतमस्तक; प्रति पंढरपुरात पांडुरंगाची केली महापूजा

Latest Marathi News Update live : कोकण किनारपट्टीला आज ऑरेंज अलर्ट, ग्रामीण भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

Ashadi Ekadashi 2025 : शेतकरी, कष्टकरी, सर्व जनतेच्या सुख-समृद्धी व राज्याच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांची पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना