ताज्या बातम्या

हरित क्रांतीचे जनक एम.एस. स्वामीनाथन यांचे निधन

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नवी दिल्ली : भारताचे महान कृषी शास्त्रज्ञ एमएस स्वामीनाथन यांचे आज निधन झाले. तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथे सकाळी 11.20 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. स्वामीनाथांनी वयाच्या ९८ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्यांना भारतातील हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते.

स्वामिनाथन हे कृषी विभागाचे शास्त्रज्ञ होते. 1972 ते 1979 या काळात त्यांनी 'भारतीय कृषी संशोधन परिषदे'चे अध्यक्ष म्हणूनही काम केले. कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना 1967 मध्ये 'पद्मश्री', 1972 मध्ये 'पद्मभूषण' आणि 1989 मध्ये 'पद्मविभूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

तर, त्यांना 84 वेळा मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली होती. त्यांना मिळालेल्या 84 डॉक्टरेट पदव्यांपैकी 24 आंतरराष्ट्रीय संस्थांनी बहाल केल्या. स्वामीनाथन यांची गणना भारतातील महान कृषी शास्त्रज्ञांपैकी एक म्हणून केली जाते, ज्यांनी भाताची अशी विविधता विकसित केली, ज्यामुळे भारतातील कमी उत्पन्न असलेल्या शेतकऱ्यांना अधिक धानाचे उत्पादन करता आले.

हरित क्रांतीने भारताचे चित्र बदलले

कृषी शास्त्रज्ञ डॉ. स्वामीनाथन यांनी 'हरितक्रांती' यशस्वी करण्यासाठी दोन केंद्रीय कृषी मंत्री सी. सुब्रमण्यम (1964-67) आणि जगजीवन राम (1967-70 आणि 1974-77) यांच्यासोबत जवळून काम केले. हा एक असा कार्यक्रम होता ज्यामध्ये रासायनिक-जैविक तंत्रज्ञानाद्वारे गहू आणि तांदळाची उत्पादकता वाढवली गेली. हरित क्रांतीमुळे भारताला धान्य क्षेत्रात स्वावलंबी होण्याच्या मार्गावर वाटचाल करता आली. हरित क्रांतीमुळे भारताचे चित्र बदलले. स्वामिनाथन यांना त्यांच्या आयुष्यात तीन पद्म पुरस्कारांव्यतिरिक्त अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

देश तोडण्याची भूमिका घेणाऱ्या काँग्रेसला अमित शहांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले; "भारताचं विभाजन..."

Jayant Patil : भुजबळ साहेब नाराज हे आम्ही ऐकून आहे

Summers: उन्हातून घरी आल्यावर चुकूनही करू नका 'या' गोष्टी...

India Alliance Meeting : बीकेसीत इंडिया आघाडीचं शक्तिप्रदर्शन, मविआ उमेदवारांच्या प्रचारासाठी होणार सभा

Anil Deshmukh : तटकरे साहेब हॉटेलमध्ये आमच्या कार्यकर्त्यांना भेटले; आमच्या संपर्कात जरी ते आले तरी आम्ही त्यांना घेणार नाही