ताज्या बातम्या

मुंबई बोट अपघात: चौकशीसाठी समिती स्थापन केली जाणार

मुंबईत गेटवे ऑफ इंडिया एलिफंटाकडे जाणारी नीलकमल नावाची बोट उलटून मोठी दुर्घटना घडली

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

  • मुंबईत गेटवे ऑफ इंडिया एलिफंटाकडे जाणारी नीलकमल नावाची बोट उलटून मोठी दुर्घटना घडली

  • बोट अपघाताच्या चौकशीसाठी समिती स्थापन केली जाणार

  • समिती स्थापन करण्याबाबत नौदलाच्यावतीने माहिती

मुंबईत गेटवे ऑफ इंडिया एलिफंटाकडे जाणारी नीलकमल नावाची बोट उलटून मोठी दुर्घटना घडली या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या अपघाताचा एक धडकी भरवणारा व्हिडीओ समोर आला. नौदलाची बोट धडकल्याने प्रवासी बोटीचे दोन तुकडे झाले.

याच पार्श्वभूमीवर आता बोट अपघाताची चौकशी करण्यात येणार असून, यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. अशी माहिती नौदलाच्या वतीने देण्यात आली. दरम्यान, नौदलाच्या बोटीवरील सहापैकी चार जणांचा मृत्यू झाला असून, नौदलाच्या दोन कर्मचाऱ्यांपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे नौदलाने सांगितले.

अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी उपाययोजना सुचविण्यासाठी विधान परिषदेच्या 5 ते 7 आमदारांची एक समिती गठित करण्यात येईल, अशी माहिती विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोन्हे यांनी विधान परिषदेत दिली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीचा वाद मिटला; मानाच्या गणपतीची सकाळी 8 वाजता मिरवणुक होणार सुरू

Nagpur Marbat : मारबत मिरवणुकीसाठी नागपूर पोलिसांचा कडक बंदोबस्त; ड्रोन कॅमेऱ्यातून नजर

Monorail : मोनोरेल पुन्हा झाली ओव्हरलोड; 50 प्रवाशांना उतरवलं खाली

Pigeon Feeding : नियंत्रित पद्धतीने कबुतरांना खाद्य देण्यासाठी तीन संस्थांनाचे अर्ज