ताज्या बातम्या

Mumbai Jogeshwari Vikhroli Link Road Pedestrain Bridges : मुंबईचा ट्रॅफिक अलर्ट! पुलाचे रेलिंग तुटल्यामुळे जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर शेकडो वाहन अडकले

Mumbai Jogeshwari Vikhroli Link Road Pedestrain Bridges : कोंडी कमी करण्यासाठी करण्यात आलेली कामे उलट अपुरी ठरत असून रस्ता आणि पादचारी सुविधा दोन्हीही धोकादायक अवस्थेत पोहोचल्या आहेत.

Published by : Riddhi Vanne

मुंबईतील जोगेश्वरी–विक्रोळी लिंक रोडवर (JVLR) वाहतूक कोंडीने नागरिक हैराण झाले आहेत. कोंडी कमी करण्यासाठी करण्यात आलेली कामे उलट अपुरी ठरत असून रस्ता आणि पादचारी सुविधा दोन्हीही धोकादायक अवस्थेत पोहोचल्या आहेत.

या मार्गावरील सारीपुतनगर ते महाकाली लेणी जोडणाऱ्या पादचारी पुलाची अवस्था अत्यंत खराब आहे. पुलावरील संरक्षक कठडा तुटलेला असल्याने चालणाऱ्या लोकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. खाली खोल दरी असल्याने अपघाताचा धोका कायम आहे. या पुलाचा वापर विद्यार्थी, नोकरदार आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने करतात. रात्री पुरेसा प्रकाश नसल्याने भीती आणखी वाढते.

दुसरीकडे, JVLR वर रस्त्यांची दुरवस्था, सुरू असलेली मेट्रोची कामे आणि विस्कळीत वाहतूक नियोजन यामुळे कोंडी नेहमीचीच झाली आहे. अवघ्या १५–२० मिनिटांचा प्रवास आता तासाभराचा ठरत आहे. त्यामुळे वाहनचालक संतप्त झाले आहेत.

दरम्यान, उरणजवळील पिरवाडी समुद्रकिनाऱ्यावर उभारलेल्या दगडी बंधाऱ्यांमुळे पर्यटकांना समुद्रापर्यंत पोहोचणे कठीण झाले आहे. किनाऱ्याची धूप रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या असल्या, तरी स्थानिक आणि पर्यटकांना त्रास सहन करावा लागत आहे.एकीकडे रस्ते कोंडीत अडकले आहेत, तर दुसरीकडे पादचारी आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेचे प्रश्न गंभीर बनले आहेत. संबंधित यंत्रणांनी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

थोडक्यात

🔹 मुंबईतील जोगेश्वरी–विक्रोळी लिंक रोड (JVLR) वर वाहतूक कोंडीने नागरिक हैराण
🔹 कोंडी कमी करण्यासाठी करण्यात आलेली कामे अपुरी ठरत असल्याचा आरोप
🔹 रस्ता आणि पादचारी सुविधा दोन्ही धोकादायक अवस्थेत पोहोचल्या
🔹 नागरिक आणि वाहनचालकांसाठी सुरक्षा प्रश्न उभे
🔹 वाहतूक आणि पादचारी सुविधांच्या दुरुस्तीची तत्काळ गरज

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा