ताज्या बातम्या

राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ सुरुच; मुंबई, ठाण्यात पुढील 3 दिवस पावसाचा अलर्ट

परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ घातला आहे. मागील काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने शहर आणि उपनगरांत बुधवारी दमदार हजेरी लावली.

मुंबई शहर आणि उपनगरांत शुक्रवारी पहाटेपासून अनेक भागांत पाऊस पडत होता. काही ठिकाणी या पावसामुळे सखल भागात पाणी देखील साचले. रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती.

याच पार्श्वभूमीवर आता मुंबई, ठाण्यात पुढील 3 दिवस पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत पुढचे दोन-तीन दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून मुंबई, ठाण्याला अलर्ट देण्यात आला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा