ताज्या बातम्या

राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ सुरुच; मुंबई, ठाण्यात पुढील 3 दिवस पावसाचा अलर्ट

परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ घातला आहे. मागील काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने शहर आणि उपनगरांत बुधवारी दमदार हजेरी लावली.

मुंबई शहर आणि उपनगरांत शुक्रवारी पहाटेपासून अनेक भागांत पाऊस पडत होता. काही ठिकाणी या पावसामुळे सखल भागात पाणी देखील साचले. रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती.

याच पार्श्वभूमीवर आता मुंबई, ठाण्यात पुढील 3 दिवस पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत पुढचे दोन-तीन दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून मुंबई, ठाण्याला अलर्ट देण्यात आला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray : 'मला कोणतंही राजकीय विधान करायचं असेल तर...' राज ठाकरे पोस्ट करत नेमकं काय म्हणाले?

Latest Marathi News Update live : आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद

Uttarakhand Pithoragarh Accident : उत्तराखंडातील पिथोरागडमध्ये भीषण अपघात; 8 जणांचा मृत्यू, 5 जखमी

Kiara Advani & Sidharth Malhotra : गुडन्यूज! सिद्धार्थ मल्होत्रा व कियारा अडवाणीला कन्यारत्न; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव