ताज्या बातम्या

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; धरणांमध्ये केवळ 'इतकं' टक्के पाणीसाठा

उन्हाचा कडाका वाढला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

उन्हाचा कडाका वाढला आहे. नागरिक उकाड्याने चांगलेच हैराण झाले असून अनेक ठिकाणी पाणीकपात केली जात आहे. मुंबईत तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यातच आता मुंबईच्या 7 तलावांमध्ये सध्या 27 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

मुंबईवर पाणीकपातीचे संकट उभे राहिले असून मुंबईला पाणी पुरवणाऱ्या धरणांमध्ये 15 टक्के पाण्याची घट झाली असल्याची माहिती मिळत आहे. मुंबईला मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार व तुळशी या सात धरणांतून दररोज 3 हजार 950 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो.

सध्या सात धरणांत एकूण 3 लाख 88 हजार 971 दशलक्ष लिटर पाणीसाठा असून मुंबईकरांवर पुन्हा पाणीकपातीचं संकट निर्माण झालं आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापर असं आवाहन करण्यात येत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा