ताज्या बातम्या

Mumbai Water shortage : मुंबईवर पाणी कपातीचं संकट? 7 धरणांमध्ये केवळ 'इतका' टक्के पाणीसाठा शिल्लक

उन्हाचा कडाका वाढला आहे. उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

उन्हाचा कडाका वाढला आहे. उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. अनेक ठिकाणी पाणी कपात करण्यात येत असून टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. अनेक ठिकाणी पाण्याचा तुटवडा भासू लागला आहे. पाणी परिस्थिती गंभीर बनली आहे. अनेक ठिकाणी पाणीकपात करण्यात येत आहे तर काही ठिकाणी पाणीच येत नाही अशी परिस्थिती आहे.

याच पार्श्वभूमीवर आता मुंबईवर पाणी कपातीचं संकट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वाढत्या उष्णतेमुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधलं पाणी कमी झाले आहे. मुंबईतील 7 धरणांमध्ये केवळ 23 टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती मिळत आहे.

2023च्या तुलनेत यंदा पाणीसाठा कमी झाला असल्याची माहिती आहे. पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्याने राखीव पाणी साठा पुरवण्याची मागणी पालिकेने राज्य सरकारकडे केली असून ती स्वीकारली आहे. 15 मे पर्यंत पाण्याच्या आढावा घेऊन कपातीबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ganesh Festival 2025 : गणेशोत्सवापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना पगाराचा गोड प्रसाद

Manikrav Kokate : रिओ वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी जिनॅस्ट संयुक्ताला क्रीडामंत्र्यांचा फोन; 'महाराष्ट्राची हिरकणी' म्हणून संबोधत गौरविले

Palghar Gas Leak : बोईसर तारापूर MIDC मध्ये पुन्हा वायुगळती; 4 कामगारांचा मृत्यू तर 1 जखमी

Ganesh Festival Pune 2025 : बाप्पा पावला! गणेशोत्सवात 24 तास धावणार मेट्रो, एकदा पाहा वेळापत्रक