ताज्या बातम्या

मुंबईत पाण्याचा प्रश्न गंभीर; मुंबईकरांसाठी राखीव पाणीसाठ्याचा वापर सुरु

मुंबईत पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला पाहायला मिळत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

मुंबईत पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला पाहायला मिळत आहे. मुंबईकरांसाठी राखीव पाणीसाठ्याचा वापर सुरु करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मोसमी पावसाला सुरुवात झाली असली तरी मात्र धरणक्षेत्रात जोरदार पावसाची प्रतिक्षा आहे.

धरणांतील पाणीसाठा 5.33 टक्क्यांच्या आसपास आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील पाणी साठा वेगाने कमी झाला आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.

त्यामुळे आता राज्य सरकारने भातसा आणि उर्ध्व वैतरणा धरणांतील राखीव साठा वापरण्यास परवानगी दिल्याची माहिती मिळत आहे. पाणी जपूण वापरण्याचं महापालिकेचं आवाहन केलं आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांचा 'चलो दिल्ली'चा नारा

Latest Marathi News Update live : राज्यात आज ॲलोपॅथी डॉक्टरांचा संप

Pune : पुण्यात कोथरूडमध्ये मध्यरात्री गोळीबार; एकजण गंभीर जखमी

Latest Marathi News Update live : मीनाताई ठाकरे पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी अटकेत