(AQI) 104 वर मुंबईचा सरासरी वायू गुणवत्ता निर्देशांक पोहोचला असून तो ‘मध्यम’ श्रेणीत नोंदवला गेला आहे. तज्ज्ञांनी यासाठी पायाभूत सुविधा प्रकल्पांशी संबंधित बांधकाम कामे आणि हवामानातील बदल यांना जबाबदार ठरवले आहे.रविवारी मुंबईचा सरासरी AQI 104 इतका नोंदवला गेला, तर बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) सारख्या काही भागांत तो ‘गंभीर’ श्रेणीत होता.शहरातील मोठ्या प्रमाणातील बांधकाम प्रकल्प, वाहनांमधून होणारे प्रदूषण आणि हिवाळ्यातील हवामान बदल यांकडे IIT आणि IMD च्या तज्ज्ञांनी या वाढीचे मुख्य कारण म्हणून बोट दाखवले आहे. मुख्यत्वे बांधकाम आणि वाहनांमधून होणारे प्रदूषण मुंबई आणि उपनगरांमध्ये AQI वाढीसाठी कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शहरात मोठ्या प्रमाणावर विकास प्रकल्प सुरू
मुंबईत अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प वेगाने सुरू आहेत—मेट्रो रेल्वे लाईनपासून ते रस्ते, पूल आणि इतर बांधकामकामे जोरात सुरू आहेत. झोपड्या, चाळी, मिल आणि औद्योगिक भागांचेही गगनचुंबी इमारतींमध्ये रुपांतर होत आहे, ज्यामुळे बांधकामाची गती वाढली आहे.
AQI चे आदर्श स्तर काय? AQI चे वर्गीकरण असे आहे:
0–50: चांगला
51–100: समाधानकारक
101–200: मध्यम
401–500: गंभीर
BMC ची कारवाई
BMC ने वायू गुणवत्ता सतत घटत असल्याने प्रदूषण नियंत्रणासाठी अनेक उपाय केले आहेत. BMC ने 28 मार्गदर्शक तत्त्वे गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये जारी केली होती.
बांधकाम स्थळांना धातुच्या पत्र्यांची कुंपणे व हिरवा कापड
नियमित पाण्याचा फवारा
मलब्याचे योग्य साठवण व वाहतूक
धूर शोषण यंत्रणा
पर्यावरणासाठी नियमांचे कडक पालन- BMC ने अलीकडेच प्रदूषण वाढवणाऱ्या 53 बांधकाम स्थळांना नोटिस देऊन काम थांबवण्याचे आदेश दिले आहेत.