ताज्या बातम्या

शिंदे-फडणवीस बोलून झाले मोकळे अन् जनतेच्या हाती भोपळे; पटोलेंचा हल्लाबोल

काल संभाजी नगरात मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत मराठवाड्यासाठी ५९ हजार कोटी रुपयाचे पॅकेज जाहीर करण्यात आले.

Published by : shweta walge

काल संभाजी नगरात मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत मराठवाड्यासाठी ५९ हजार कोटी रुपयाचे पॅकेज जाहीर करण्यात आले. यावरच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मराठवाड्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती असतानाही तेथे दुष्काळ जाहीर न केल्याबद्दल संताप व्यक्त केला आहे.

शिंदे-फडणवीस मुंबईप्रमाणे छत्रपती संभाजीनगरातही ‘बोलून झाले मोकळे’ आणि मराठवाड्यातील जनतेच्या हाती आले फक्त भोपळे, असा टोला पटोलेंनी लगावला आहे. मराठवाड्यातील जनतेच्या समस्या मार्गी लागाव्यात यासाठी शिंदे-फडणवीस-पवार सरकारने छत्रपती संभाजीनगरात मंत्रिमंडळ बैठक घेतली. पण, त्यातून मराठवाड्याच्या जनतेला काहीही मिळालेले नाही.

५९ हजार कोटींच्या योजना दिल्याचा ढोल पिटला जात असला, तरी तो आकड्यांचा खेळ असून प्रत्यक्षात जनतेच्या हाती जेव्हा काही लागेल तेंव्हाच ते कळेल, अस म्हणत त्यांनी हल्लाबोल केला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा