Narayan Rane
Narayan Rane 
ताज्या बातम्या

उमेदवारी जाहीर होताच नारायण राणेंची तोफ धडाडली, जोरदार शक्तिप्रदर्शन करत म्हणाले, "४०० पारमध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्गचा..."

Published by : Naresh Shende

भारतीय जनता पक्षाने रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभेसाठी नारायण राणे यांची उमेदवारी काल गुरुवारी जाहीर केली. याच पार्श्वभूमीवर राणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. यावेळी जनतेला संबोधीत करताना राणे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. अबकी बार ४०० पार, असा संकप्ल नरेंद्र मोदींनी केला आहे. भाजप आणि मित्रपक्ष मिळून ४०० पार जागा जिंकायच्या आहेत. या ४०० जागांमध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्गचा खासदार असावा, असं आवाहन राणे यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील जनतेला केलं आहे.

नारायण राणे जनतेला संबोधीत करताना म्हणाले, अबकी बार ४०० पार, असा संकप्ल नरेंद्र मोदींनी केला आहे. भाजप आणि मित्रपक्ष मिळून ४०० पार जागा जिंकायच्या आहेत. भारत विकसीत देश बनवण्यासाठी या जागा जिंकायच्या आहेत. भारतातील गरिबी जाऊन आत्मनिर्भर भारत बनावा, यासाठी मोदी तिसऱ्यांदा निवडून येऊन हॅट्ट्रीक करणार आहेत. त्यांची हॅट्ट्रीक करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. या ४०० पारमध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्गचा खासदार असावा, अशी माझी तुम्हाला विनंती आहे. प्रमोद सावंद, उदय सामंत, किरण सामंत, दिपक केसरकर, रविंद चव्हाण यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांचा मी ऋणी आहे.

भाजपने नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर केल्यानं ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांना या निवडणुकीत तगडं आव्हान असणार आहे. गेल्या काही दिवसांपासून राऊतांनी प्रचारसभांच्या धडाका लावून राणेंवर तोफ डागली होती. राणेंच्या विरोधात आरोपांची राळ उठवणाऱ्या राऊतांना राणेंनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. अशातच आता राणे विरुद्ध राऊत असा राजकीय संघर्ष रंगणार असून या लोकसभा निवडणुकीत कोकणात विजयाचा गुलाल कोण उधळतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...

"उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये आधीच विलीन झालाय"; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा

टी-२० वर्ल्डकपआधी कर्णधार रोहित शर्माचं फॉर्मबाबत मोठं विधानं; म्हणाला,"फलंदाज म्हणून मला..."

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...