शिवसेना शिंदे गटाचे नेते नरेश मस्के यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटावर टिकास्त्र केले आहे. नरेश मस्के म्हणाले की, "भाकरी हिंदुत्त्वाची करतात. चाकरी ही मंडळी कॉंग्रेसच्या पुरोगामी विचारांशी करतात. शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते करत आहेत. मुळात त्यांची भूमिका आहे का? कॉंग्रेस नेते राहूल गांधी जे सांगतील ते ही लोक करतात हीच त्यांची भूमिका आहे", असे नरेश मस्के यांनी म्हटले आहे.