Navjyot Singh Sidhu
Navjyot Singh Sidhu 
ताज्या बातम्या

हार्दिक पंड्याला वनडे,टी-२० चा कर्णधार करा, बुमराह टेस्ट क्रिकेटची धुरा सांभाळणार? सिद्धूच्या प्रतिक्रियेनं चर्चांना उधाण

Published by : Naresh Shende

टीम इंडियाचे दिग्गज माजी क्रिकेटर नवज्योतसिंग सिद्धूने हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमराहबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. रोहित शर्माने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर हार्दिक पंड्याला भारताचा पुढचा कर्णधार बनवला पाहिजे. तर कसोटी क्रिकेटची कमान जसप्रीत बुमराहकडे सोपवली पाहिजे, असं सिद्धूनं म्हटलं आहे. सिद्धूच्या या प्रतिक्रियेमुळं क्रिडाविश्वात अनेक तर्क वितर्कांना उधाण आलं आहे.

नवज्योतसिंग सिद्धू माध्यमांशी बोलताना म्हणाला, रोहित शर्मा अजूनही भारताचा कर्णधार आहे. परंतु, भविष्यात टीम इंडियाच्या कर्णधारपदाबाबत विचार करावा लागेल. हार्दिक पंड्याकडे कर्णधारपदासाठी असणारे सर्व गुण आहेत. त्याला वनडे आणि टी-२० चं कर्णधारपद दिलं पाहिजे. हार्दिक पंड्या भारताचं भविष्य आहे. रोहित शर्मा ३६-३७ वर्षांचा झाला आहे. आता तो आणखी काही वर्ष खेळेल.

तो खूप जबरदस्त कर्णधार आणि खेळाडू आहे. त्याला खेळताना पाहिल्यावर असं वाटतं की, वेळ थांबली आहे. पण तुम्हाला भविष्यात नवीन कर्णधारही तयार करायचा आहे. त्याला कसोटी क्रिकेटचा कर्णधार करा, असं मी म्हणत नाही, तो तुमचा उपकर्णधार आहे. जेव्हा रोहित शर्मा नव्हता, त्यावेळी त्याने जवळपास एक वर्ष टी-२० मध्ये कॅप्टन्सी केली होती. त्यामुळे हार्दिक पंड्या पहिलं प्राधान्य आहे. त्यामुळेच बीसीसीआयने त्याला उपकर्णधार केलं आहे. कोणताही निर्णय घेण्याआधी बीसीसीआय खूप रणनीती आखत असते, असंही सिद्धू म्हणाले.

Dengue: राज्यात मागील पाच वर्षांत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ

RCB VS CSK: आरसीबीने 27 धावांनी विजय मिळवून प्लेऑफमध्ये केली दमदार एन्ट्री

Megablock: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेवर 15 दिवस मेगाब्लॉक; तर काही गाडया रद्द

साताऱ्यातील मिनी काश्मीर आणि महाबळेश्वरमध्ये बरसला अवकाळी पाऊस

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...