ताज्या बातम्या

राष्ट्रवादीचे काही नेते भाजपाच्या गळाला लागणार आहे; ‘या’ नेत्यानं केलं वक्तव्य

राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले आहे.

Published by : Siddhi Naringrekar

राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले आहे. अनेकजण काहीना काही मुद्द्यांवर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. यातच आता प्रकाश आंबेडकर यांनी एक वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चेंना उधान आलं आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, महाविकास आघाडी नेहमी एकत्र असणार, हे विधान करुन जे गुमराह केलं जातं आहे, त्याकडे उद्धव ठाकरे यांनी लक्ष दिलं पाहिजे. राष्ट्रवादीचे काही नेते भाजपच्या गळाला लागणार आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस राजकीयदृष्ट्या सर्वात कमकुवत पक्ष आहे. पहिल्या क्रमांकावर जयंत पाटील यांचं नाव आहे. तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करा नाहीतर तुम्हाला अटक करु, असा अल्टिमेटम जयंत पाटलांना दिला तर ते भाजपमध्ये जायला कधीही तयार होतील. असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Waqf Amendment Bill : वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकातील तरतुदी, न्यायालयाची तात्पुरती स्थगिती

आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे तांदळाची पेज; जाणून घ्या फायदे

Sanjay Raut On IND-PAK Match : पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या सक्षम केलं' भारत-पाक सामन्यावर संजय राऊतांचा संताप

Latest Marathi News Update live : जालन्यात बंजारा समाजाचा मोर्चा