उंच गणेशमूर्ती समुद्रात विसर्जित करण्यास दिलेली सशर्त परवानगी येत्या मार्च महिन्यात संपणार असून, याबाबत उच्च न्यायालयाने स्पष्ट भूमिका मांडली आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार, उंच मूर्तींच्या समुद्रातील विसर्जनाला केवळ मार्चपर्यंतच परवानगी देण्यात आली आहे.
नाशिकचे भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी राजीनामा दिला आहे. महापौर आणि उपमहापौर नाव निश्चितीवर सुनील केदार नाराज असल्याची माहिती मिळत असून प्रदेश पातळीवरून आलेले महापौर आणि उपमहापौर नाव ऐनवेळी बदलण्यात आल्याने सुनील केदार यांनी राजीनामा दिल्याची माहिती मिळत आहे.
राज्यात सध्या हवामानात मोठ्या प्रमाणावर बदल पाहायला मिळत आहेत. कधी थंडी, कधी पावसाची शक्यता, तर कधी अचानक उकाडा अशा विचित्र स्थितीमुळे नागरिक गोंधळून गेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही भागांमध्ये ढगाळ वातावरण निर्माण झाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतल्याचे पाहायला मिळत आहे. सरकारी विभागांमधून होणाऱ्या अनावश्यक खर्चावर आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे.
पुण्यात पुन्हा एकदा हिट अँड रनचा प्रकार घडला आहे. सीएनजी पंपावर उभा असलेल्या महिलेला कार चालकाने उडवल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
विरारमधील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. विरारमधील फळ विक्रेता फळांवर गटारातील पाण्याचा शिडकाव करत असल्याचे समोर आले आहे. चक्क गटारातील पाणी फळांवर टाकून ते विक्री करत असल्याचा धक्कादायक प्रकार पाहायला मिळत असून एका जागरूक नागरिकाने हा प्रकार समोर आणला आहे.
राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. 5 फेब्रुवारी 2026 ऐवजी आता 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान होणार असून 7 फेब्रुवारी 2026 ऐवजी आता 9 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी पार पडणार आहे.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठी दुर्घटना होता होता टळली. मुंबई एअरपोर्टवर धावपट्टीवरच विमानांची टक्कर झाल्याचे पाहायला मिळाले. एअर इंडिया आणि इंडिगो या दोन कंपन्यांच्या विमानांचे पंख एकमेकांना जोरात धडकले.
फेब्रुवारी महिना सुरू होताच राज्यासह देशातील अनेक भागांमध्ये तापमानात वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. हवामान खात्याने पुढील चार ते पाच दिवसांत किमान तसेच कमाल तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याचा इशारा दिला आहे.
मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) वाढते प्रदूषण रोखण्यासाठी उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अमजद सय्यद आणि अनुजा प्रभुदेसाई यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय देखरेख समिती स्थापन करण्यात आली आहे.