ताज्या बातम्या

भारतात मंदी येणार का? अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या...

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत महागाईवर सरकारच्या वतीने उत्तर दिले. यूपीएच्या काळात देशातील महागाई 9 वेळा दुहेरी अंकात गेली होती.

Published by : Team Lokshahi

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत महागाईवर सरकारच्या वतीने उत्तर दिले. यूपीएच्या काळात देशातील महागाई 9 वेळा दुहेरी अंकात गेली होती. किरकोळ महागाई 22 महिन्यांसाठी 9% च्या वर होती, तर आम्ही महागाई 7% च्या खाली आणण्याचा प्रयत्न करत आहोत, असा दावा करत विरोधकांना महागाईवर जोरदार उत्तर दिले.

निर्मला सीतारामन म्हणाल्या की, गेल्या 5 महिन्यांपासून सातत्याने 1.4 लाख कोटी रुपयांहून अधिक जीएसटी कलेक्शन झाले आहे. 8 जूनमध्ये पायाभूत सुविधा क्षेत्राची वाढ दुहेरी अंकात झाली. अमेरिकेच्या जीडीपीमध्ये दुसऱ्या तिमाहीत 0.9% आणि पहिल्या तिमाहीत 1.6% घसरण झाली, ज्याला त्यांनी अनधिकृत मंदी म्हटले. भारतात मंदीचा प्रश्नच येत नाही. ब्लूमबर्गच्या सर्वेक्षणानुसार भारतात मंदीची शक्यता शून्य आहे.

सरकारने उचललेल्या पावलांमुळे खाद्यतेलाच्या किमती झपाट्याने खाली आल्या आहेत. महामारी असूनही, दुसरी लाट, ओमिक्रॉन, रशिया-युक्रेन (युद्ध), आम्ही महागाई 7% किंवा त्याहून कमी ठेवली. त्यावर विश्वास ठेवावा लागेल. शनिवारी रघुराम राजन म्हणाले की, आरबीआयने भारतातील परकीय चलनाचा साठा वाढवण्यासाठी आणि पाकिस्तान आणि श्रीलंकासारख्या शेजारी देशांच्या समस्यांपासून भारताचे संरक्षण करण्याचे चांगले काम केले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Chhagan Bhujbal : "मिळालेलं आरक्षण नको आहे का?" छगन भुजबळांचा मराठा समाजाला थेट सवाल!

Uddhav Thackeray On PM Modi : "मोदींच्या मनात पाप असलं तरी मी..." उद्धव ठाकरेंची मोदींवर टीका

Nikhil Bane : "Finally माझ्या आयुष्यात ती आली..." म्हणत 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निखिल बनेने केली पोस्ट शेअर

Team India's New Jersey Sponsor : टीम इंडियाच्या जर्सीवर 'ड्रीम 11' नाही तर आता ही स्पॉन्सर म्हणून दिसणार 'ही' कंपनी