Admin
ताज्या बातम्या

पुढची सभा मंगल कार्यालयातच घ्यावी लागेल; नितेश राणे यांची टीका

वज्रमुठ सभेतून उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

Published by : Siddhi Naringrekar

वज्रमुठ सभेतून उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मुंबईतील बीकेसी मैदानावर ही सभा पार पडली. या सभेवर आता अनेकांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता नितेश राणे यांनी टीका केली आहे. नितेश राणे म्हणाले की, अदानींचं चरित्र लिहिण्यापेक्षा उद्धव ठाकरे तुमचं चरित्र लिहा. तुमचं इन्कम कुठून येतं? कोणतीही कंपनी नाही मग एवढं पैसे कुठून येतात? हे मराठी तरुणांना कळू द्या. उगाच मोहित कंबोजच्या नादाला लागू नकोस. आदित्य आणि तेजस यांचं नाईट लाईफ समोर येईल. असे नितेश राणे म्हणाले.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, कालच्या सभेत मुस्लिम बांधवाना टोप्या काढायला लावल्या होत्या. उद्धव ठाकरेंच हेच हिंदुत्व आहे का?माझ्याकडे अजून बरीच माहिती आहे. ती लवकरच बाहेर काढेन.उद्धव ठाकरेंनी काल जी सभा घेतली ती पाहता, पुढची सभा मंगल कार्यालयात घ्यावी लागेल. असे नितेश राणे म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा