Admin
Admin
ताज्या बातम्या

पुढची सभा मंगल कार्यालयातच घ्यावी लागेल; नितेश राणे यांची टीका

Published by : Siddhi Naringrekar

वज्रमुठ सभेतून उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मुंबईतील बीकेसी मैदानावर ही सभा पार पडली. या सभेवर आता अनेकांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता नितेश राणे यांनी टीका केली आहे. नितेश राणे म्हणाले की, अदानींचं चरित्र लिहिण्यापेक्षा उद्धव ठाकरे तुमचं चरित्र लिहा. तुमचं इन्कम कुठून येतं? कोणतीही कंपनी नाही मग एवढं पैसे कुठून येतात? हे मराठी तरुणांना कळू द्या. उगाच मोहित कंबोजच्या नादाला लागू नकोस. आदित्य आणि तेजस यांचं नाईट लाईफ समोर येईल. असे नितेश राणे म्हणाले.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, कालच्या सभेत मुस्लिम बांधवाना टोप्या काढायला लावल्या होत्या. उद्धव ठाकरेंच हेच हिंदुत्व आहे का?माझ्याकडे अजून बरीच माहिती आहे. ती लवकरच बाहेर काढेन.उद्धव ठाकरेंनी काल जी सभा घेतली ती पाहता, पुढची सभा मंगल कार्यालयात घ्यावी लागेल. असे नितेश राणे म्हणाले.

"...तर तुम्हाला गुलामगिरीत राहावं लागेल"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गेंचा PM मोदींवर निशाणा

T20 World Cup: रोहित शर्माला ४ नंबरवर खेळवा, सलामीला 'या' खेळाडूला पाठवण्याचा मॅथ्यू हेडनचा टीम इंडियाला सल्ला

IPL 2024 : चेन्नईच्या मैदानात आज MS धोनी खेळणार शेवटचा सामना? 'त्या' पोस्टमुळं चर्चांना उधाण

चंद्रशेखर बावनकुळेंना संजय राऊतांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले; "काळू-बाळूच्या तमाशाने तुमच्या कानाखाली..."

आपल्या छातीवर धनुष्यबाण होता, पण आता मशाल आहे? निवडणुकीत काय परिणाम होणार? उद्धव ठाकरेंनी रोखठोक सांगितलं, म्हणाले...