Admin
ताज्या बातम्या

100 खोके मातोश्रीकडे पोहोचले पाहिजेत म्हणून...; नितेश राणेंची जोरदार टीका

कोकणातील बारसू रिफायनरीवरुन राजकारण चांगलेच तापले आहे.

Published by : Siddhi Naringrekar

कोकणातील बारसू रिफायनरीवरुन राजकारण चांगलेच तापले आहे. आरोप - प्रत्यारोप होत आहेत. उद्धव ठाकरे बारसूमध्ये दाखल झाले असून ते ग्रामस्थांशी चर्चा करत आहेत.

उद्धव ठाकरे म्हणाले की, शिंदेंची देशात गद्दार म्हणून ओळख. रिफानरीसाठी लोकांची डोकी फोडण्याचा त्यांनी घाट घातला आहे. सरकारने या स्थानिकांशी संवाद साधावा. लोकांना रिफायनरी नको असेल तर रिफायनरी नको करु. लोकांचा विरोध असल्यास रिफायनरी होणार नाही. वाईट प्रकल्प कोकणात नको. असे उद्धव ठाकरे म्हणाले. असे उद्धव ठाकरे म्हणाले.

त्यानंतर नितेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. नितेश राणे म्हणाले की, आम्हाला माहिती मिळाली आहे की, तेव्हाचे सरकार म्हणून केंद्र सरकारकडे जे पत्र पोहोचवलं होतं त्या एका पत्राची किंमत १०० कोटी होती. ते १०० खोके मातोश्रीकडे पोहोचले पाहिजेत म्हणून पत्र व्यवहार केला होता.

एक पर्यटक मुंबईवरून आला आहे, बारसू गावात हेलिकॉप्टर उतरू दिलं नाही म्हणून जैतापूरमध्ये उभं केलं आहे. बारसू गावात लोकांशी बोलून, पेटवापेटवीचं काम ते करणार आहेत. नेमकं ते इथे पेटवण्याचं काम करण्याची भाषा करत आहेत, ते पेटवा पेटवी करण्यासाठी नाही तर आपल्या घराची चूल पेटली पाहिजे याकरता ते येथे आलेत असे नितेश राणे म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

PM Narendra Modi : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक सन्मानित व्यक्ती

Malnourished Children : राज्यात कुपोषित बालकांचा आकडा धडकी भरवणारा ; महिला आणि बालविकास मंत्र्यांची माहिती

Deepika Padukone : दीपिका पदुकोण हॉलिवूडमध्ये इतिहास रचणार! 'Walk of Fame'वर स्थान मिळवणारी पहिली भारतीय अभिनेत्री

Shubman Gill : शुभमन गिलचे इंग्लंडमध्ये ऐतिहासिक दुहेरी शतक; भारतीय क्रिकेटसाठी नवा अध्याय