ताज्या बातम्या

PM Pakistan Shabaz Sharif : पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली, म्हणाले, "पहाटे 2.30 वाजता फोनवरून माहिती दिली आणि..."

भारताने केलेल्या प्रत्युत्तराच्या कारवाईवर आता पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी मोठे विधान केले आहे.

Published by : Shamal Sawant

पहलगाम हल्ल्यानंतर 7 मे ते 11 मे दरम्यान भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली. पाकिस्तानने सतत ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी भारतावर हल्ला केला, ज्याला भारतीय सैन्यानेही चोख प्रत्युत्तर दिले. भारताने केलेल्या प्रत्युत्तराच्या कारवाईवर आता पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी मोठे विधान केले आहे. त्याने कबूल केले आहे की भारतीय हवाई दलाने नूर खान एअरबेस आणि इतर तळांवर केलेल्या हवाई हल्ल्यांबद्दल त्याला जनरल असीम मुनीर यांनी पहाटे 2.30 वाजता फोनवरून माहिती दिली होती. तसेच भारताने युद्धबंदीचा प्रस्ताव दिला होता, असा दावाही त्यांनी केला आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ म्हणाले, "9-10 मे च्या रात्री सुमारे 2.30 वाजता, जनरल सय्यद असीम मुनीर यांनी मला सीमा रेषेवर फोन करून माहिती दिली की भारतीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे नूर खान एअरबेस आणि इतर काही भागात पडली आहेत." आपल्या हवाई दलाने आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर केला आणि त्यांनी चिनी लढाऊ विमानांवर आधुनिक उपकरणे आणि तंत्रज्ञानाचा वापर केला.

शाहबाज शरीफ पुढे म्हणाले, "आज सर्वत्र चर्चा आहे की पाकिस्तानी सैन्याने भारताला कसे प्रत्युत्तर दिले. आमच्या सैन्याने पठाणकोट, उधमपूर आणि इतर अनेक ठिकाणी हल्ला केला आणि शत्रूंना लपण्यासाठी जागा सापडली नाही. जनरल असीम मुनीर यांनी मला फोन करून सांगितले की आम्ही त्यांना योग्य उत्तर दिले आहे आणि आता ते युद्धबंदी करू इच्छितात, यावर तुमचे काय मत आहे? मी म्हणालो- यापेक्षा मोठे काय असू शकते".

नंतर ते म्हणाले की, "सकाळी मी पोहायला गेलो आणि माझा फोन सोबत घेऊन गेलो. जनरल असीम मुनीर यांनी मला फोन करून सांगितले की आम्ही त्यांना योग्य उत्तर दिले आहे आणि आता ते युद्धबंदी करू इच्छितात, यावर तुमचे काय मत आहे? मी म्हणालो- यापेक्षा मोठे काय असू शकते. तुम्ही शत्रूला जोरदार थाप दिली आहे आणि आता त्याला युद्धबंदी करावी लागली आहे. मला वाटतं की तुम्ही विलंब करू नये आणि युद्धबंदीचा प्रस्ताव स्वीकारावा."

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा