ताज्या बातम्या

PM Narendra Modi : 'पहलगाम दहशतवादी हल्ला हा तर मानवेतवरचा हल्ला'; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुनावलं

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, देशाने हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांना योग्य उत्तर दिले आहे.

Published by : Rashmi Mane

पश्चिम बंगालमधील बागडोगरा येथून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे "सिक्कीम@५०: जिथे प्रगती उद्देश पूर्ण करते आणि निसर्ग विकासाचे पोषण करतो" या कार्यक्रमाला संबोधित करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, देशाने हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांना योग्य उत्तर दिले आहे. पर्यटन हा विविधतेचा उत्सव आहे, असे वर्णन करताना मोदी म्हणाले की, "सिक्कीममधील सर्व लोक पर्यटनाची शक्ती चांगल्या प्रकारे जाणतात. पर्यटन हे केवळ मनोरंजन नाही तर विविधतेचा उत्सवदेखील आहे."

पहलगाम येथील पर्यटन स्थळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या संबंधी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, "दहशतवाद्यांनी मानवतेवर, बंधुतेवर हल्ला केला आहे. दहशतवाद्याने भारतातील अनेक कुटुंबांचा आनंद हिरावून घेतला. त्यांनी भारताचे विभाजन करण्याचा कटही रचला. पण संपूर्ण जग पाहत आहे की, भारत पूर्वीपेक्षा किती जास्त एकसंध आहे. आम्ही एकत्रितपणे ऑपरेशन सिंदूरद्वारे दहशतवाद्यांना योग्य उत्तर दिले. आम्ही त्यांचे दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केल्यानंतर, पाकिस्तानने संतापाच्या भरात आमच्या नागरिकांवर आणि सैन्यावर हल्ला केला. यामुळे पाकिस्तान उघडा पडला. त्यांचे अनेक हवाई तळ उद्ध्वस्त करून, आम्ही त्यांना दाखवून दिले की भारत किती अचूक आणि वेगाने कारवाई करू शकतो," असे पंतप्रधान मोदी म्हणाले."

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Asia Cup 2025 : ब्रोंको टेस्ट पास करा तरचं संघात चान्स! BCCI चा नवा नियम; ब्रोंको टेस्ट म्हणजे काय? Bronco Test

Rohit Pawar : शिखर बँक घोटाळाप्रकरणी आमदार रोहित पवारांची जातमुचलक्यावर सुटका

Raigad Boat Accident : रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, बचावकार्य युद्धपातळीवर

Latest Marathi News Update live : रायगडच्या उरणजवळ समुद्रात बोट बुडाली