Admin
ताज्या बातम्या

चक्क गावकऱ्यांनी गावच काढलं विकायला; कारण वाचाच

नाशिकच्या देवळा तालुक्यातील फुलेमालवाडी गावकऱ्यांनी चक्क गावच विकायला काढले आहे.

Published by : Siddhi Naringrekar

संदिप जेजुरकर, नाशिक

नाशिकच्या देवळा तालुक्यातील फुलेमालवाडी गावकऱ्यांनी चक्क गावच विकायला काढले आहे. त्यामुळे सगळीकडे या गावाच्या निर्णयाची चर्चा होऊ लागली आहे. मात्र, गावकऱ्यांवर गाव विकण्याची वेळ का आली असा सवाल आता उपस्थित होत आहे. कुठल्याच शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी थेट शासनालाच गाव विकण्याचा निर्णय घेतला आहे.

यामध्ये शासनाला ठराव करून गाव विकण्याचा प्रस्ताव पाठविला जाणार आहे. गावकऱ्यांनी एकत्र येत याबाबत ठराव देखील केला आहे. उत्पादन खर्चही निघत नसल्याने गावकरी चिंतेत आहेत. त्यामुळे गाव विकून त्यातील पैशाने आम्हाला जगता येईल असा निर्णय घेत गावकऱ्यांनी गाव विकण्याचा निर्णय घेतला आहे. गावच्या या निर्णयामुळे शासकीय यंत्रणेसह लोकप्रतिनिधींची मोठी अडचण झाली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Janasuraksha Bill : विरोधकांच्या सभात्यागानंतरही विधान परिषदेत जनसुरक्षा विधेयक मंजूर

Indian Coast Guard : अंदमान समुद्रात भारतीय तटरक्षक दलाची धाडसी कारवाई; 'Sea Angel' नौकेचे यशस्वी बचाव अभियान

Chhatrapati Sambhajinagar : धनगर विद्यार्थ्यांच्या शिक्षण योजनेत भ्रष्टाचार; दोन शाळांची मान्यता रद्द, अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई

Latest Marathi News Update live : जनसुरक्षा विधेयक विधान परिषदेतही मंजूर