ताज्या बातम्या

मुक्ता टिळक यांना पंतप्रधान मोदींनी वाहिली श्रध्दांजली; भाजपाप्रती त्यांची कटिबध्दता नेहमीच संस्मरणीय

मुक्ता टिळक यांचे दीर्घ आजाराने आज निधन झाले. त्यांना सर्वपक्षीयांकडून आदरांजली वाहण्यात येत आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

पुणे : भाजपच्या आमदार आणि पुणे शहराच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांचे दीर्घ आजाराने आज निधन झाले. त्यांना सर्वपक्षीयांकडून आदरांजली वाहण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मराठीत मुक्ता टिळक यांना श्रध्दांजली वाहिली आहे. भाजपाप्रती त्यांची कटिबध्दता कार्यकर्त्यांसाठी नेहमीच संस्मरणीय राहील, असे त्यांनी म्हंटले आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, मुक्ता टिळक यांनी समाजाची आत्मीयतेने सेवा केली. लोकोपयोगी मुद्दे उपस्थित करून त्यांनी आपला ठसा उमटवला आणि पुण्याच्या महापौर म्हणून त्यांची कारकीर्द लक्षणीय होती. भाजपाप्रती त्यांची कटिबध्दता कार्यकर्त्यांसाठी नेहमीच संस्मरणीय राहील. त्यांच्या निधनाने दुःख झाले. त्यांचे कुटुंबीय आणि समर्थक यांच्याप्रती शोकसंवेदना व्यक्त करतो. ओम शांती, असे ट्विट त्यांनी केले आहे.

तर, मुक्ता टिळक यांच्या निधनाने ध्येयनिष्ठ आणि समर्पित नेतृत्व हरपले आहे, अशा शोकसंवेदना व्यक्त करीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

दरम्यान, मुक्ता टिळक मागील काही वर्षांपासून कॅन्सरशी लढा देत होत्या. आठ ते दहा दिवसांपासून त्यांच्यावर गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरु होते. परंतु, त्यांची झुंज अखेर अयशस्वी ठरली. व आज साडेतीन वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुक्ता टिळक यांच्या पार्थिवाचे उद्या सकाळी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यांनंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Anjali Damania On Dhananjay Munde : 'ती' फाईल गायब केली' दमानियांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल

Devendra Fadnavis Called Sharad pawar And Uddhav Thackeray : "आम्हाला तुमच्याही पाठिंब्याची गरज" फडणवीसांची थेट पवार आणि ठाकरेंना फोनवर विनंती; राजकीय वर्तुळात भूकंप

Share Market News : रशिया-युक्रेन युद्ध संपण्याच्या शक्यतेने गुंतवणूकदारांना दिलासा; सेंसेक्स आणि निफ्टीत वाढ

Himachal Monsoon : हिमाचल प्रदेशात पावसाचा कहर! आत्तापर्यंत 276 नागरिकांचा मृत्यू