Thane : टेंभी नाका देवी उत्सवात शिवसेनेचे दोन्ही गट आमनेसामने, गेल्यावर्षीच्या 'त्या' घटनेनंतर पोलिसांचा कडक बंदोबस्त  Thane : टेंभी नाका देवी उत्सवात शिवसेनेचे दोन्ही गट आमनेसामने, गेल्यावर्षीच्या 'त्या' घटनेनंतर पोलिसांचा कडक बंदोबस्त
ताज्या बातम्या

Thane : टेंभी नाका देवी उत्सवात शिवसेनेचे दोन्ही गट आमनेसामने, गेल्यावर्षीच्या 'त्या' घटनेनंतर पोलिसांचा कडक बंदोबस्त

ठाण्यातील टेंभी नाका देवी उत्सवामध्ये यंदाही शिवसेनेचे दोन्ही गट एकमेकांच्या विरोधात उभे राहण्याची शक्यता असल्याने महापालिका निवडणुकीची तयारी आणि उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडक सुरक्षा वाढवली आहे.

Published by : Riddhi Vanne

थोडक्यात

  • नवरात्री उत्सावाला आजपासून सुरुवात झाली आहे.

  • ठाण्यातील टेंभी नाका देवी उत्सवामध्ये यंदाही शिवसेनेचे दोन्ही गट एकमेकांच्या विरोधात उभे राहण्याची शक्यता आहे.

  • महापालिका निवडणुकीची तयारी आणि उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडक सुरक्षा वाढवली आहे.

दिवंगत नेते आनंद दिघे यांनी सुरू केलेल्याठाण्यातील टेंभी नाका देवी उत्सवामध्ये यंदाही शिवसेनेचे दोन्ही गट एकमेकांच्या विरोधात उभे राहण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकीची तयारी आणि उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडक सुरक्षा वाढवली आहे, ज्यामुळे कोणताही वाद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

टेंभी नाका येथील जय अंबे मा नवरात्र उत्सवाची स्थापना शिवसेनेचे प्रभावशाली नेते आनंद दिघे यांनी केली होती. त्यानंतर, आनंद दिघे यांच्या निधनानंतर एकनाथ शिंदे आणि राजन विचारे यांची देवीच्या स्वागतासाठी एकत्र येणं सुरू झालं. मात्र तीन वर्षांपूर्वी शिवसेनेत फूट पडल्यामुळे आता दोन्ही नेते एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी बनले आहेत.

शिवसेना फुटल्यानंतर दोन्ही गटांमध्ये तणाव

2022 मध्ये, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि त्यावेळी देवीच्या आगमनाच्या वेळी ठाकरेंच्या गटाचे राजन विचारे आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकले. यावेळी जोरदार घोषणाबाजी झाली आणि वातावरण तणावपूर्ण झाले. अखेर, दोन्ही गटांनी आपापले कार्यकर्ते बाजूला केले आणि देवीचे आगमन शांततेत पार पडले. त्यानंतर, पोलिसांनी टेंभी नाका येथे विशेष खबरदारी घेणं सुरू केलं. त्यानंतर राजन विचारे देवीच्या दर्शनासाठी थोड्याच वेळासाठी उपस्थित राहतात आणि नंतर मिरवणुकीतून बाहेर जातात.

आनंद दिघे यांच्या संदर्भात संजय राऊतांचे वक्तव्य आणि वाढते तणाव

अलीकडेच खासदार संजय राऊत यांनी आनंद दिघे यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे ठाण्यात राजकीय वातावरण तापल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर, देवीच्या आगमनाच्यावेळी यंदाही दोन्ही गटांमध्ये एकमेकांविरोधात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आला आहे.

रश्मी ठाकरे यांचा उपस्थितीवर वाद

दरवर्षीप्रमाणे, 2022 मध्ये देखील रश्मी ठाकरे देवीच्या ओटी भरण्यासाठी आणि आरती करण्यासाठी राजन विचारे यांच्यासोबत उपस्थित होत्या. त्यावेळी देखील दोन्ही गटांमध्ये घोषणाबाजी झाल्याने टेंभी नाक्यावरील वातावरण तणावपूर्ण झाले होते.

ठाकरेंच्या गटाच्या कार्यकर्त्यांनी आरोप केला आहे की, रश्मी ठाकरे यांच्या उपस्थितीच्या वेळी मंडळातील एसी बंद केला जातो आणि लाईट्स बंद केली जातात. या प्रकारामुळे दरवर्षी वाद निर्माण होतो. यावर्षी देखील काही अशाच प्रकारच्या तणावाची शक्यता असल्याने, सर्वांचे लक्ष टेंभी नाका देवी उत्सवाकडे लागले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा