मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावातील पाणीसाठा वेगाने कमी होत असून केवळ 48 टक्के पाणीसाठी शिल्लक असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे आता मुंबईत 1 मार्चपासून 10 टक्के पाणीकपातीची शक्यता आहे.
याच पार्श्वभूमीवर आता भातसा आणि अप्पर वैतरणा धरणातील पाणीसाठा मिळावा अशी मागणी मुंबई महानगरपालिकेने राज्य सरकारकडे पत्राव्दारे केली आहे.
मुंबईकडे पाणीसाठा 48% आहे. हा साठा 15% वर गेल्यानंतर पाण्याच्या रिझर्व स्टॉकची गरज भासते. भातसा, अप्पर वैतरणा मधील अतिरिक्त साठा मुंबई महापालिकेने जलसंपदा खात्याकडे मागितलाय. दरवर्षी हा साठा मागितला जातो. असे मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल म्हणाले.