ताज्या बातम्या

'जरांगेंच्या डोक्यात आता राजकारणाचं वारं शिरलंय' प्रविण दरेकरांची जरांगेंवर टीका

प्रवीण दरेकर यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे. दरेकर म्हणाले की, जरांगेंनी आता राजकारण सुरू केले असून, मराठा समाजाच्या मागण्यांवर लक्ष केंद्रित केलेले नाही. इम्तियाज जलील यांची भेट लोकांना आवडली नाही.

Published by : shweta walge

भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे. मराठा समाजाने त्यांना नाव व चेहरा दिला. त्यांच्यामध्ये आता राजकारणाचे वारे घुमले आहे. त्यांनी आता समाजाच्या गोष्टी करू नये. फुलफ्लेज राजकारण करावे. मराठा समाजासाठी त्यांच्या मागणी राहिलेली नाही अशी टीका त्यांनी केली.

ते म्हणाले की, त्यांनी सर्व जागा लढाव्यात, लोक त्यांच्या पाडापाडीच्या राजकारणाला बळी पडणार नाही.ओबीसींच्या हनुवाटीला हात लावायचा. इम्तियाज जलील यांची भेट लोकांना आवडली नाही. इम्प्तियाज जलील मराठा समाजाचा झेंडा खांद्यावर घेऊन नाचणार का? मग त्याच्यासोबत कसे जाताम्हणून मराठा समाज त्यांच्यासोबत राहणार नाही. अस ते म्हणाले.

दरम्यान काही दिवसांपूर्वी एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. या भेटीमुळं राज्यातील मराठा आणि मुस्लिम समाज एकत्र येऊन सत्ताधाऱ्यांविरोधात रणशिंग फुंकणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा