Eknath Shinde Team Lokshahi
ताज्या बातम्या

बंडखोर आमदारांच्या कुटुंबियांचे संरक्षण काढले, एकनाथ शिंदे आक्रमक

राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशाने काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे.

Published by : Team Lokshahi

Maharashtra Political Crisis : महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर आता अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्या गटात एकमेकांवर आरोप-प्रत्योरोप करण्यात येत आहे. आत एकनाथ शिंदे आमदारांच्या गटातील संरक्षण काढून घेतल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी एक टि्वट करुन सरकारला ईशारा देण्यात आला आहे.

शिवसेनेचे नेते व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारला आणि संबंध महाराष्ट्र हादरला. त्यांच्यांसोबत 45 पेक्षा जास्त आमदार असल्याचा दावा केला जात आहे. त्यांच्याबरोबर गेलेल्या आमदारांच्या कुटुंबियांचे संसक्षण राज्य सरकारने काढून घेतले आहे. यासंदर्भात एकनाथ शिंदे आक्रमक झाले आहे.

एकनाथ शिंदे यांनी एक ट्वीट करत सरकारला इशारा दिला आहे. राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशाने काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे, असा थेट इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.

गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांकडून शिवसेनेचे खच्चीकरण करण्यात येत होते, असेही ट्विट एकनाथ शिंदे यांनी केले आहे. दरम्यान, शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांना आज नोटीस पाठविण्यात येणार आहे. 27 जूनपासून विधानसभा उपाध्यक्षांपुढं सुनावणी होणार आहे. बंडखोरांच्या निलंबनाबाबत कायदेशीर लढाई सुरु झाल्याचा दावा शिवसेनेने केला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Local Train Updates : आज देखील मुंबई लोकल वेळापत्रक कोलमडले! हार्बर, मध्य आणि पश्चिम मार्गावर 30–35 मिनिटांनी उशीरा ट्रेन

Devendra Fadnavis On Konkan Railway : मुख्यमंत्र्यांकडून चाकरमान्यांसाठी खूशखबर! आता गणपतीला कोकणात जाण आणखी सोप; पण कसं?

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना आज पैशाचे महत्त्व समजेल , कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Latest Marathi News Update live : हार्बर मार्ग 15-20, मध्य रेल्वे 20-25 तर पश्चिम रेल्वे 30-35 मिनिटांनी उशिराने धावत आहे