ताज्या बातम्या

गृहिणींचं बजेट कोलमडणार; आता डाळी आणि कडधान्येही महागली

Published by : Siddhi Naringrekar

महागाईचा वाढता आलेख थांबण्याचे नावच घेत नाही आहे. या वाढत्या महागाईमुळे सामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री बसली आहे. भाज्याचे दर वाढले आहे. अनेक भाज्या या 100 ते 120 रुपये किलो झाल्या आहेत. यातच आता डाळी, कडधान्येही महागलीव आहेत. यासर्व महागाईमुळे गृहिणींचं बजेट कोलमडणार आहे.

तूरडाळीच्या दरात वाढ झाली आहे. तूरडाळीचे दर 120 ते 140 रुपये किलोवर पोहोचले आहे, तर कडधान्यांनेही शंभरी पार केली आहे. मूगडाळ 108 ते 121 रुपये किलो, उडीद डाळ 110 ते 130 रुपये किलो, चणाडाळ 68 ते 75 रुपये किलो, मसूर डाळ 78 ते 86 रुपये किलो झाली आहे. वाल 240 ते 250 रुपये किलो, काबुली चणे 120 ते 140 रुपये किलो झाले आहेत. यासोबतच अख्खा मूग बाजारात 100 ते 120 रु. किलो, मटकी 110 ते 130 रु. किलो, पांढरा वाटाणा 64 ते 72 रु. किलो, लाल चणा 60 ते 75 रु. किलो, काबुली चणा 120 ते 140 रु. किलो रुपयांनी महाग झाला आहे.

"परळी तालुक्यात अधिकाऱ्यांना धमकावून बोगस मतदान "; ट्वीटरवर व्हिडीओ शेअर करत आमदार रोहित पवारांनी केले गंभीर आरोप

IPL 2024 : अभिषेक-क्लासेनचा झंझावात! वादळी खेळी करून पंजाब किंग्जचा उडवला धुव्वा, हैदराबादचा दमदार विजय

"पाकिस्तानचा झेंडा घेऊन मिरवणाऱ्या उबाठाच्या उमेदवारांवर कारवाई करा"; किरण पावसकरांचा ठाकरेंवर हल्लाबोल

IPL 2024 : आरसीबीने CSK विरोधात रचला इतिहास; टी-२० क्रिकेटमध्ये 'हा' कारनामा करणारा ठरला पहिला संघ

"लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यांमध्ये महाविकास आघाडीनेच बाजी मारलीय"; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा मोठा दावा