ताज्या बातम्या

Radhakrishna Vikhe-patil : राज्यातील महापालिका, नगरपालिकांनी नद्यांची वाट लावली; जलसंपदा मंत्र्यांनी फटकारले

महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायती यांचे सांडपाणी नदीमध्ये जात असल्याने नद्या प्रदूषित होत आहेत.

Published by : Rashmi Mane

राज्यातील महानगरपालिका, नगरपालिकांनी नद्यांची वाट लावली आहे, अशा शब्दात राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नदी काठच्या स्थानिक स्वराज्य संस्थांना फटकारले आहे. महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायती यांचे सांडपाणी नदीमध्ये जात असल्याने नद्या प्रदूषित होत आहेत. यापुढे जलसंपदा विभागाच्या मार्फत सर्व महानगरपालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायतींचे सांडपाणी एकत्रित करून त्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. ते पाणी पुन्हा नदीत सोडले जाण्याबाबत विचार सुरू आहे, असेही त्यांनी नमूद केले.

शनिवारी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पंढरपूर येथे २१ व्या जलसिंचन परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. राज्यातील सर्व धरणांच्या पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होते. हे बाष्पीभवन रोखण्यासाठी धरणांवर सोलर पॅनल बसवले जाणार आहेत. त्यामुळे जलसंपदा विभागाचे उत्पन्न देखील वाढणार आहे आणि पाण्याचे बाष्पीभवन कमी होणार आहे. तसेच राज्यामध्ये शेतीला पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा करण्याचा भोपाळ पॅटर्न राबवण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे, अशी माहिती देखील विखे-पाटील यांनी दिली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Heavy Rain Alert : महाराष्ट्रानंतर आता 'या' राज्यात धुवांधार पावसाची एंट्री! येणारे चार दिवस सलग झोडपणार; 'या' जिल्ह्यांमध्ये IMD ने जारी केला अलर्ट

Saath Nibhana Saathiya Gopi Bahu : 'साथ निभाना साथिया' फेम 'गोपी बहू'ने गुपचुप केले लग्न, जाणून घ्या कोण आहे? जियाचा नवरा

GST Slab : आता अनेक वस्तूंवरील कर दर कमी होणार! GST चे चार पैकी दोन स्लॅब रद्द होणार; सर्वसामान्यांना मोठा दिलासा

Uttar Pradesh Crime : नोरा फतेहीसारखी फिगर मिळवण्यासाठी पतीने केला पत्नीचा छळ; नेमकं प्रकरण काय?