ताज्या बातम्या

'महाराष्ट्रात भाजप कशी जिंकली हे जनता जाणते'; मोदींच्या गुजरातमध्ये राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल

टककारस्थान करून भाजपनं महाराष्ट्रात निवडणूक जिंकली, राहुल गांधींचा काँग्रेसच्या सभेत दावा

Published by : Rashmi Mane

काँग्रेसचे 84 वे अधिवेशन बुधवार, ९ एप्रिल रोजी गुजरातमधील अहमदाबाद येथे पार पडले. या अधिवेशनात काँग्रेसचे नेते तथा खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सडकून टीका केली. तसेच या भाषणात त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचाही उल्लेख केला. कटकारस्थान करून भाजपने महाराष्ट्रातील निवडणूक जिंकली, असा दावा राहुल गांधी यांनी केला.

पुढे राहुल गांधी म्हणाले की, "आम्ही जाती आधारित जनगणना करण्याची मागणी केली होती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ती मान्य केली नाही. आम्ही सत्तेत आलो की जाती आधारित जनगणेचा कायदा मंजूर करू. देश आता कंटाळला आहे. तुम्ही बघा बिहारच्या निवडणुकीत काय होतं तर. भाजपने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक कशा पद्धतीने जिंकली हे तुम्ही तिथे जाऊन लोकांना विचारा. आम्ही निवडणूक आयोगाला महाराष्ट्राच्या मतदारांची यादी विचारत आहोत. ही यादी मागून आम्ही थकलो आहोत. पण अजूनही निवडणूक आयोग आम्हाला महाराष्ट्रातील मतदारांची यादी देत नाहीये," असे राहुल गांधी म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : थोड्याच वेळात राज ठाकरे यांची पत्रकार परिषद

Raj Thackeray - Devendra Fadnavis : राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Pune : पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नवे नाव राजगड; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा ऐतिहासिक निर्णय

Rain Update : आजपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान विभागाने वर्तवला अंदाज