ताज्या बातम्या

Odisha Train Accident : रेल्वे अपघातावर राहुल गांधी म्हणाले, काँग्रेसच्या काळातही रेल्वे अपघात झाला होता पण…

ओडिशाच्या बालासोरमध्ये रेल्वेचा भीषण अपघात झाला होता. यामध्ये आतापर्यंत २८८ जणांचा मृत्यू झाला आहे

Published by : Siddhi Naringrekar

ओडिशा : Odisha Train Accident: ओडिशाच्या बालासोरमध्ये रेल्वेचा भीषण अपघात झाला होता. यामध्ये आतापर्यंत २८८ जणांचा मृत्यू झाला आहे, तर हजाराहून अधिक लोक जखमी झाले आहेत. या अपघाताबाबत रेल्वे बोर्डाने पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण घटनेचा खुलासा केला आहे.

 राहुल गांधी सध्या अमेरिकेत आहेत.  यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी म्हणाले की, भाजपला विचारलं की हा ओडिसातील रेल्वे अपघात कसा झाला तर ते म्हणतील, की काँग्रेसने मागच्या 50 वर्षात काय केलं? काँग्रेसच्या काळातही असाच रेल्वे अपघात झाला होता. तेव्हा काँग्रेस नेत्यांनी असं नाही म्हटलं की हा अपघात इंग्रजांमुळे झाला…. उलट त्यांनी म्हटलं की मी या अपघाताची मी जबाबदारी घेतो अन् राजीनामा देतो. पण आता तसं घडताना दिसत नाही. असे राहुल गांधी म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : पावसामुळे मध्य, हार्बर रेल्वे ठप्प ; रेल्वेकडून अधिकृत घोषणा

BEST credit society polls Result : भाजप की ठाकरे बंधू? बेस्ट क्रेडिट सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीचा आज निकाल

Mumbai University Exams Postponed : मुसळधार पावसामुळे मुंबई विद्यापीठाने आजच्या परीक्षा पुढे ढकलल्या

11th Online Admission : अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी 'या' तारखेपर्यंत मुदत वाढवली