ताज्या बातम्या

Odisha Train Accident : रेल्वे अपघातावर राहुल गांधी म्हणाले, काँग्रेसच्या काळातही रेल्वे अपघात झाला होता पण…

Published by : Siddhi Naringrekar

ओडिशा : Odisha Train Accident: ओडिशाच्या बालासोरमध्ये रेल्वेचा भीषण अपघात झाला होता. यामध्ये आतापर्यंत २८८ जणांचा मृत्यू झाला आहे, तर हजाराहून अधिक लोक जखमी झाले आहेत. या अपघाताबाबत रेल्वे बोर्डाने पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण घटनेचा खुलासा केला आहे.

 राहुल गांधी सध्या अमेरिकेत आहेत.  यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी म्हणाले की, भाजपला विचारलं की हा ओडिसातील रेल्वे अपघात कसा झाला तर ते म्हणतील, की काँग्रेसने मागच्या 50 वर्षात काय केलं? काँग्रेसच्या काळातही असाच रेल्वे अपघात झाला होता. तेव्हा काँग्रेस नेत्यांनी असं नाही म्हटलं की हा अपघात इंग्रजांमुळे झाला…. उलट त्यांनी म्हटलं की मी या अपघाताची मी जबाबदारी घेतो अन् राजीनामा देतो. पण आता तसं घडताना दिसत नाही. असे राहुल गांधी म्हणाले.

मंधाना-शेफालीचा धमाका! टीम इंडियाची विजयी हॅट्ट्रिक; बांगलादेशचा धुव्वा उडवून T20 मालिका जिंकली

"धेर्यशील माने किंवा इतर उमेदवार महत्त्वाचे नाहीत, कारण...", हातकणंगलेत देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

Daily Horoscope 3 May 2024 Rashi Bhavishya: 'या' राशींच्या लोकांचा शुभ काळ होणार सुरु; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष ३ मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

"ज्यांनी गुन्हा केला नाही, त्यांना तुरुंगात टाकण्याचं काम मोदी सरकारनं केलं", सांगलीच्या सभेत शरद पवारांचा हल्लाबोल