Rahul Gandhi On CBI And ED 
ताज्या बातम्या

१७०० कोटींची नोटीस मिळाल्यानंतर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधी ट्वीटरवर म्हणाले, "जेव्हा सरकार बदलेल..."

प्राप्तिकर विभागाने तब्बल १७०० कोटी रुपयांची नोटिस काँग्रेसला पाठवलीय. ही नोटिस मिळाल्यानंतर राहुल गांधी यांनी ट्वीटरच्या माध्यमातून सीबीआय, ईडीला धारेवर धरलं आहे.

Published by : Naresh Shende

प्राप्तिकर विभागाने काँग्रेसला तब्बल १७०० कोटी रुपयांची नोटीस पाठवलीय. ही नोटीस मिळाल्यानंतर राहुल गांधी यांनी ट्वीटरच्या माध्यमातून सीबीआय, ईडीला धारेवर धरलं आहे. राहुल गांधी यांनी केलेल्या ट्वीटने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. "जेव्हा सरकार बदलेल तेव्हा लोकशाहीची दडपशाही करण्यांवर नक्कीच कारवाई होणार. त्यानंतर असं काही करण्याची कुणाचीच हिंमत होणार नाही", असा इशारा राहुल गांधी यांनी सीबीआय आणि ईडीला दिला आहे.

काँग्रसने पत्रकार परिषद घेऊन भाजपवर कर दशहतवाद पसरवल्याचा आरोप केला आहे. तसच भाजप लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहे, असा हल्लाबोल काँग्रेसने भाजपवर केला आहे. तसंच राहुल गांधी यांनी ट्वीट करत म्हटलं, राहुल गांधी यांनी ट्वीटरवर म्हटलंय, जर सीबीआय आणि ईडीसारख्या संस्थांनी व्यवस्थित काम केलं असतं, तर असं काही घडलं नसतं. कोणत्या ना कोणत्या दिवशी भाजपच सरकार बदलेल आणि मग कारवाई होणार, याचा त्यांनी विचार करावा. अशी कारवाई होईल की अशाप्रकारच्या गोष्टी कधीच होणार नाही, याची मी शाश्वती देतो.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात

Jalgaon Accident : आयशर वाहनाची एसटी बसला जोरदार धडक; बसचे मोठे नुकसान, 1 जणाचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी