ताज्या बातम्या

Raj Thackeray : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण; राज ठाकरेंनी पहिल्यांदाच केलं भाष्य, म्हणाले...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा पार पडला.

Published by : Siddhi Naringrekar

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा पार पडला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानावर गुढीपाडवा मेळाव्यात जोरदार भाषण केलं. यावेळी राज ठाकरे यांनी राज्यातील विविध प्रश्नांवर भाष्य केल आहे.

यामध्येच राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर देखील भाष्य केलं आहे. राज ठाकरे म्हणाले की, मी आजपर्यंत ऐकलं होते राखेमधून फिनिक्स पक्षी उभारी घेतो. आमच्या बीडमधून राखेतून गुंड तयार होतात. संतोष देशमुखने त्याला विरोध केला उद्या तिथे संतोष देशमुख नसता दुसरा कोणीही असता.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, विषय होता, पैशांचा, खंडणीचा, आपण लेबल काय लावलं? वंजाऱ्याने मराठ्याला मारलं. त्यात वंजाऱ्यांचा काय संबंध आणि मराठ्यांचा काय संबंध, कशात गुंतून पडतोय. पण तुम्हाला गुंतवलंय जातं आहे. राजकीय पक्ष तुम्हाला गुंतवतात, त्याच्यातच गुंतून राहा. असे राज ठाकरे म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : थोड्याच वेळात राज ठाकरे यांची पत्रकार परिषद

Raj Thackeray - Devendra Fadnavis : राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Pune : पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नवे नाव राजगड; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा ऐतिहासिक निर्णय

Rain Update : आजपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान विभागाने वर्तवला अंदाज