Raj Thackeray Team Lokshahi
ताज्या बातम्या

राज ठाकरेंच्या भाषणामुळे नाराज; 16 वर्षांपासून मनसेत असलेल्या पदाधिकाऱ्याचा राजीनामा

राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे पक्षातील मुस्लीम पदाधिकारी नाराज

Published by : Team Lokshahi

दौंड | विनोद गायकवाड : राज ठाकरे यांच्या औरंगाबादच्या (Aurangabad) सभेनंतर राज्याती राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. कधी काळी मराठी अस्मितेच्या मुद्दयावरुन राजकारणात उतरलेल्या राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आता हिंदुत्वादाची शाल पांघरली आहे. यामाध्यमातून राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित करत मुस्लीम समाजाला अल्टीमेटम दिला आहे. यावरुन आक्रमक हिंदुत्वादी (Hinduism) लोकांचं समर्थन राज ठाकरे यांनी मिळवलं असलं तरी, दुसरीकडे पक्षातील मुस्लीम पदाधिकारी मात्र नाराज झाले आहेत.

राज ठाकरे यांनी भोंग्याचा मुद्दा उपस्थित करताच मनसेतील अनेक मुस्लीम पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा औरंगाबादच्या सभेनंतरही राजीनामे येण्यास सुरुवात झाली असल्याचं पाहायला मिळतंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबाद सभेनंतर 16 वर्षांपासून मनसेत असणाऱ्या दौंडचे शहराध्यक्ष जमीर सय्यद यांनी राजीनामा दिला आहे.

औरंगाबादमध्ये झालेल्या सभेनंतर सोळा वर्षांपासून मनसेमध्ये असणाऱ्या जमीर सय्यद यांनी राजीनामा दिला आहे. सध्या दौंड शहराचे मनसे शहराध्यक्ष असलेल्या जमीर सय्यद यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सय्यद हे गेल्या तीन वर्षांपासून शहरअध्यक्ष पदावर काम करत होते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Shubman Gill : 'त्या' प्रकरणामुळे शुभमन गिल अडचणीत? BCCI कडून कारवाईची शक्यता

MNS Leader Video Viral : मनसे नेत्यांच्या मुलाचा 'त्या अवस्थेतील' Video Viral; अभिनेत्रींला केली शिवीगाळ

Latest Marathi News Update live : पुढील २४ ते ४८ तासांसाठी विदर्भाला ऑरेंज अलर्ट

Pandharpur : पंढरपुरात सुरक्षा रक्षकाची दादागिरी! दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकाला अमानुष मारहाण