Raj Thakarey X post :"...हे भीषण दुर्दैव आहे"  Raj Thakarey X post :"...हे भीषण दुर्दैव आहे"
ताज्या बातम्या

Raj Thakarey X post :"...हे भीषण दुर्दैव आहे" 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' पाहिल्यानंतर राज ठाकरेंची पहिली पोस्ट

चित्रपट प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील चित्रपट पाहून त्याचे कौतुक केले असून, “सध्याच्या काळावर भाष्य करणारा आणि वास्तव दाखवणारा चित्रपट म्हणजे ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’” असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

Published by : Riddhi Vanne

(Raj Thakarey ) महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रतीक असलेले छत्रपती शिवाजी महाराज आजच्या काळात अवतरतात आणि शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढा देतात, अशी कथा असलेला‘पुन्हा शिवाजीराजे भोसले हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित या चित्रपटात सिद्धार्थ बोडके यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. सध्या हा चित्रपट प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील चित्रपट पाहून त्याचे कौतुक केले असून, “सध्याच्या काळावर भाष्य करणारा आणि वास्तव दाखवणारा चित्रपट म्हणजे ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ (Punah Shivajiraje Bhosale) असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

काय म्हणाले राज ठाकरे?

मी २ दिवसांपूर्वी, माझे मित्र आणि एक उत्तम दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा, 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' हा चित्रपट पाहिला... समकालीन सिनेमा हा शब्द सहज वापरला जातो पण तो अनेकदा असतोच असं नाही... पण खरा समकालीन, किंवा आत्ताच्या परिस्थितीवरचा चित्रपट बघायचा असेल तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' या चित्रपटाला पर्याय नाही...

आज फक्त मोठे मोठे महामार्ग, पूल (ज्यावर काही महिन्यात खड्डे पडतात ) आणि चमकदार घोषणा म्हणजे 'विकास' अशी कल्पना सत्ताधाऱ्यांनी रुजवली आहे. यांत बाकी कोणाचा विकास होतो की नाही माहित नाही पण सत्ताधाऱ्यांचा विकास नक्की होतो. हे केलं आणि धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की मग शेतकरी असो की इथला मराठी माणूस यांना हवं तसं वापरून फेकून द्यायला हे मोकळे.

पुढे राज ठाकरे लिहितात की, या राज्यातील शेतकरी तर पार हतबल आहे. एका बाजूला पाऊस झोडपतो आणि दुसऱ्या बाजूला सरकारी यंत्रणा अनास्थेने झोडपते.. याच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या मुलांना एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य उभं केलं, त्याच महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या करतो हे भीषण दुर्दैव आहे. एका बाजूला ग्रामीण भागात शेतकऱ्याला इतकं जेरीस आणायचं की त्याला जमीन विकावीच लागेल आणि दुसरीकडे शहरात मराठी माणसांनाच घरं नाकारायची, त्यांच्या भाषेचा अपमान करणाऱ्यांना अभय द्यायचं, त्यांनी काय खायचं ? काय नाही खायचं यावर बंधन आणणऱ्यांचे लाड करायचे हे सुरु आहे.

पुढे राज ठाकरे लिहितात की, हे सगळं मराठी माणसाला दिसत नाहीये का ? दिसत असेल ही... पण जोपर्यंत तुमच्या मनात याविरोधात चीड निर्माण होणार नाही, आग निर्माण होणार नाही, तोपर्यंत परिस्थिती बदलणं सोडा अजून भीषण होईल. या सिनेमातून ही चीड महेश मांजरेकर, त्यांचे कलाकार आणि त्यांचे लेखक यांनी उत्तम मांडली आहे. हा फक्त चित्रपट नाही तर या टीमच्या मनातील अस्वस्थता आहे. ही अस्वस्थता महाराष्ट्रातील जनतेने अनुभवयाला हवी. त्यासाठी माझं तुम्हाला आवाहन आहे की 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' हा चित्रपट जरूर पहा...

राज ठाकरे ।

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा